मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार : वडेट्टीवार


मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. लवकरच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य चर्चेत आहे. वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


नेमके काय म्हणाले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ?


'आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही. मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ. मुंबईत काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू' असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. याआधी काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढेल, असे संकेत दिले होते.


भाई जगताप आणि विजय वडेट्टीवार या दोन नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


Comments
Add Comment

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री