मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार : वडेट्टीवार


मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. लवकरच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य चर्चेत आहे. वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


नेमके काय म्हणाले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ?


'आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही. मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ. मुंबईत काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू' असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. याआधी काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढेल, असे संकेत दिले होते.


भाई जगताप आणि विजय वडेट्टीवार या दोन नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


Comments
Add Comment

माथेरान पर्यटन स्थळावरील मूलभूत सुविधांचा बोजवारा

सुविधांची पूर्तता करण्यात प्रशासन हतबल माथेरान : पर्यटन नगरी माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असले तरी

नवी मुंबईकरांवर वाढीव पाणीपट्टीचा बोजा?

महापालिकेत पाणी दरवाढीचा प्रस्ताव नवी मुंबई  : नवी मुंबई महापालिकेने शहरातील पाणी दर वाढवण्याचा प्रस्ताव सादर

नेरूळमधील फ्लेमिंगो अभयारण्यालगत गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-६० येथील फ्लेमिंगो अभयारण्यालगत प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींनी

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.