मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार : वडेट्टीवार


मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. लवकरच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य चर्चेत आहे. वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


नेमके काय म्हणाले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ?


'आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही. मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ. मुंबईत काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू' असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. याआधी काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढेल, असे संकेत दिले होते.


भाई जगताप आणि विजय वडेट्टीवार या दोन नेत्यांच्या वक्तव्यांमुळे मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


Comments
Add Comment

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख

Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे

Pratap Sarnaik : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपीडो, उबेर ' सारख्या ॲप आधारित कंपन्या वर गुन्हे दाखल करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

मुंबई : (३ डिसेंबर) शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या '

सरकारकडून सारथी ॲप अनिवार्य करण्याचा निर्णय मागे, लोकाग्रहास्तव सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: आज अखेर सरकारने लोकाग्रहास्तव आपला निर्णय मागे घेतला आहे. सरकारने आज लोकसभेत देखील लोकांच्या