मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी उद्या होणार सुनावणी, अभियंत्यांची चूक नाही असा वकिलांचा दावा!

ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्यांबाबत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार असल्याचे न्यायमूर्ती जी. टी. पवार यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे अधिकार्‍यांनी आणि रेल्वे पोलिसांनी सादर केलेले दोन्ही अहवाल तपासूनच ही सुनावणी होणार आहे.



मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकादरम्यान ९ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लोकलमधून पडून पाच जणांचा मृत्यू तर ८ प्रवासी जखमी झाले होते. याबाबत विशाल डोळस आणि समर यादव या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा अपघात रेल्वे पोलिसांच्या चुकीमुळे झाल्याचा दावा अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी केला आहे.




या अपघाताच्या पाच महिन्यानंतर व्हीजेटीआयच्या अहवालानुसार रेल्वेच्या विशाल डोळस आणि समर यादव या दोन अभियंत्यांवर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या निषेधार्थ रेल्वे युनियनने गुरुवारी केलेल्या आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या दोन्ही अभियंत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. शुक्रवारी या अर्जावर ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश जी.टी. पवार यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.



अभियंत्यांचे वकिल बलदेवसिंग राजपूत आणि प्रियांका डबले यांनी बाजू मांडताना मध्य रेल्वेचा एक अहवाल न्यायाधीशांसमोर सादर केला. त्यामध्ये गर्दीमुळे हा अपघात झाल्याचे दर्शविण्यात आले होते. तसेच, अपघाता दिवशी त्याच मार्गावरून २०० गाड्या धावल्या, जर काही बिघाड असता तर आणखी अपघात झाले असते, असा युक्तीवाद केला.

Comments
Add Comment

मेट्रो-२ बी वरील मंडाले-चेंबूर टप्पा एप्रिलपासून सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले आहे की, मेट्रो लाईन २ बी वरील मंडाले-चेंबूर

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

Rashmika Mandanna Latest News: रश्मीका मदांना व विजय देवरकोंडाच फेब्रुवारीमध्ये लग्न सोहळा; रश्मीकाची धक्कादायक प्रतिक्रिया...

गोल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिक मदाना व अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या लग्नाबद्दल

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता

अखेर भाजपचा गटनेता ठरला, गणेश खणकर यांची नियुक्ती

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपाच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खणकर हे प्रभाग ३ मधून

फडणवीसांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटलांना छत दिलं, ताकद दिली अन् तेच..., जयकुमार गोरेंची मोहिते पाटलांवर जोरदार टीका

सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण