विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार


मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने पुन्हा एकदा या १२६ किमी लांबीच्या रस्ते प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच लवकरच टेंडर मागवले जाणार आहे. गेल्या महिन्यात, प्रोजेक्टचा पहिला टप्पा बील्ड ऑपरेट अॅण्ड ट्रान्सफर (बीओटी) अंतर्गत बांधण्याच्या एमएसआरडीसीच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर, महामंडळाकडून कामाला सुरूवात करण्यात आली होती.



प्रवास अवघ्या दीड तासांत पूर्ण होणार


बीओटी अंतर्गत असणाऱ्या या प्रोजेक्टच्या कामासाठी महामंडळाने सरकरकडे रिपोर्ट्स पाठवले आहेत. या रिपोर्टला मंजूरी मिळताच, विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या निर्मितीसाठी बीओटी सिस्टिमचा वापर करून टेंडर मागवले जातील. या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे विरार आणि अलिबागमधील ४ तासांचा प्रवास केवळ ९० मिनिटांत म्हणजेच दीड तासात पूर्ण होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, टोलमधून प्रकल्पाचा खर्च वसूल झाल्यानंतर रस्ता सरकारकडे सुपूर्द केला जाणार आहे.



प्रकल्प बीओटी तत्त्वावर


२०१६ मध्ये पहिल्यांदा या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला होता. यासाठी बऱ्याचदा निविदा मागवण्यात आल्या होत्या, परंतु कोणत्याही कंपन्यांनी यामध्ये रस दाखवला नाही. काही महिन्यांपूर्वी मागवलेल्या टेंडरवर कंपन्यांनी ३६ टक्क्यांपेक्षा अधिक बोली लावली होती.


या समस्येचे निराकरण करण्यासाठी, एमएसआरडीसीने हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकारने बँक हमी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. ही रक्कम प्रोजेक्टसाठी जमीन मिळवण्यासाठी खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.



दोन टप्प्यांमध्ये कॉरिडोर


१२६ किमी लांब कॉरिडोरची दोन टप्प्यांमध्ये निर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत, पालघरच्या नवघर येथून पेणच्या बलावली दरम्यान ९६,४१० किमी लांबीचा मार्ग बनणार आहे. हा मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर, एमएमआरच्या कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग एनपीटी, नवी मुंबई एअरपोर्ट, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा हायवे, पनवेल-जेएनपीटी आणि अटल सेतूशी कनेक्ट केला जाणार आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर