'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण पचण्यास हलके असल्यामुळे आता अनेकजण शाकाहाराकडे वळले आहेत. मात्र भारतामध्ये असे एक शहर आहे, जे जगातले पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषीत झाले आहे.


गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील 'पालीताना' या शहरात नॉन व्हेज वर संपूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे पालीताना हे जगातले पहिले शाकाहारी शहर बनले आहे. यामुळे पर्यटनासाठी पालीताना येथे जाणाऱ्या लोकांना आता केवळ शाकाहारी खावे लागणार असून स्थानिक लोकांनीसुद्धा शाकाहाराला पसंती दिली आहे.



पालीताना शहर संपूर्णत: शाकाहारी करण्यामागे धार्मिक श्रद्धा महत्वाची मानली जात आहे. या शहरात जैन धर्मियांचे एक तिर्थस्थान आहे. देश आणि जगभरातील जैन धर्माच्या लोकांसाठी हे एक महत्वाचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे जैन मुनींनी या शहरात मांसाहार करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभुमीवर हे शहर शाकाहाराकडे वळले आहे.


गुजरातच्या अहमदाबाद पासून ३८१ किमीवर असणाऱ्या पालीताना शहरात मासांहारावर बंदी घालण्यासाठी २०१४ पासून जैन मुनींनी उपोषण केले होते. यात कत्तलखान्यांना बंद करण्याची मागणी होती. जैन धर्मियांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी सरकारने मांस,अंडी विक्री आणि पशुवधावर प्रतिबंध घातला. एवढेच नाही तर नियम तोडल्यावर दंडाची तरतूद केली.

Comments
Add Comment

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर