'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण पचण्यास हलके असल्यामुळे आता अनेकजण शाकाहाराकडे वळले आहेत. मात्र भारतामध्ये असे एक शहर आहे, जे जगातले पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषीत झाले आहे.


गुजरात मधील भावनगर जिल्ह्यातील 'पालीताना' या शहरात नॉन व्हेज वर संपूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे पालीताना हे जगातले पहिले शाकाहारी शहर बनले आहे. यामुळे पर्यटनासाठी पालीताना येथे जाणाऱ्या लोकांना आता केवळ शाकाहारी खावे लागणार असून स्थानिक लोकांनीसुद्धा शाकाहाराला पसंती दिली आहे.



पालीताना शहर संपूर्णत: शाकाहारी करण्यामागे धार्मिक श्रद्धा महत्वाची मानली जात आहे. या शहरात जैन धर्मियांचे एक तिर्थस्थान आहे. देश आणि जगभरातील जैन धर्माच्या लोकांसाठी हे एक महत्वाचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे जैन मुनींनी या शहरात मांसाहार करण्यास विरोध केला होता. या पार्श्वभुमीवर हे शहर शाकाहाराकडे वळले आहे.


गुजरातच्या अहमदाबाद पासून ३८१ किमीवर असणाऱ्या पालीताना शहरात मासांहारावर बंदी घालण्यासाठी २०१४ पासून जैन मुनींनी उपोषण केले होते. यात कत्तलखान्यांना बंद करण्याची मागणी होती. जैन धर्मियांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी सरकारने मांस,अंडी विक्री आणि पशुवधावर प्रतिबंध घातला. एवढेच नाही तर नियम तोडल्यावर दंडाची तरतूद केली.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली