उबाठाच्या ताब्यातील गड भाजपा करणार काबिज

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विशेष बैठका आणि सभा


नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांसोबत पदाधिकाऱ्यांना लावले कामाला


मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मुंबईवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला असून त्याचाच एक भाग म्हणून उबाठाच्या ताब्यात असलेल्या गडांवर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे उबाठाचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये भाजपाने बैठका तसेच सभा आयोजित करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक सक्रीय करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या प्रभागांच्या जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यादृष्टीकोनातूनच भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत उबाठाच्या माजी नगरसेकांच्या प्रभागांमध्ये बैठका, सभा घेवून त्यांच्यातील गड काबिज करण्याची जय्यत तयारी करत आहे. या माध्यमातून भाजपाने आपल्या नगरसेवकांची संख्या अधिक वाढवण्याचा निर्धार केला आहे.

मुंबईत सन २०१७च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालिन शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढली आणि या निवडणुकीत भाजपाचे ८२ नगरसेवक तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. परंतु आता शिवसेनेची दोन छकले पडलेली असून एकनाथ शिंदे मुख्यनेता असलेल्या शिवसेनेकडे आता यातील ४९ नगरसेवक आहेत, तर उबाठा शिवसेनेकडे ५१ नगरसेवक आहे. याशिवाय शिवसेनेकडे आता काँग्रेस आणि मनसेचेही नगरसेवक आहेत. सन २०१७च्या निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढून ८२ नगरसेवक निवडून आणू शकले. परंतु आता उबाठाकडे आता अजुनही ५० आसपास माजी नगरसेवक असल्याने त्यांच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये भाजपाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

उत्तर मध्य जिल्हा तथा लोकसभा मतदार संघातील कलिना आणि वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजपाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. आजवर या दोन्ही मतदार संघात तत्कालिन शिवसेनेलाच जागा जात असल्याने भाजपाला याठिकाणी नशिब आजमवता आलेले नाही. परंतु कलिना व वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ८८मध्ये भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक तसेच सभा घेतली. या प्रभागात उबाठा शिवसेनेचे सदा परब हे निवडून आले होते. परंतु या मतदार संघात भाजपाने आतापासूनच आपली दावेदारी सांगून उबाठाकडून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विलेपार्ले, कलिना आणि वांद्रे पूर्व अशा तीन विधानसभा मतदार संघामध्ये हा प्रभाग मोडला जातो. तर यापूर्वी वांद्रे पूर्व विधानसभेतील प्रभाग ९३मध्येही अशाचप्रकारे भाजपा मुंबई अध्यक्षांनी बैठक तथा सभा घेतली होती. या प्रभागात उबाठाच्या रोहिणी कांबळे निवडून आल्या होत्या.

कलिना विधानसभेत उबाठा आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक तर काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे कलिना आणि वांद्रे विधानसभा मतदार संघात भाजपाचे अधिक लक्ष आहे. याबरोबरच शहरातील वरळी आणि शिवडी विधानसभा तसेच दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला पूर्व,विलेपार्ले, विक्रोळी, मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर पश्चिम,मागाठाणे या मतदार संघातील उबाठाच्या प्रभागांमध्ये जिथे भाजपाचे उमेदवार मागील निवडणुकीत तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झाले किंवा जिथे शिवसेनेचा सक्षम उमेदवार नाही अशा प्रभागांमध्ये भाजपाने आतापासूनच फिल्डींग लावून विद्यमान नगरसेवकांची संख्या राखतानाच उबाठाच्या नगरसेवकांच्या जागा जिंकून आपली संख्या वाढवण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.
Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान