ITR Aadhar- Pan Card Link: तुमचे आधार पॅन कार्ड जोडलय का? नसेल जोडल्यास लवकर जोडा नाहीतर होणारे गंभीर आर्थिक परिणाम

मोहित सोमण:आपले पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले आहे का? नसेल तर आताच जोडा कारण आता ३१ डिसेंबर २०२५ शेवटची तारीख आधार - पॅन कार्ड जोडण्यासाठी (Aadhar Pan Link) असणार आहे. यापुढे लिंक न केल्यास आपले पॅन निष्क्रिय (Inactive) होऊ शकते असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.


नव्या नियमानुसार आता हे लिकेंज लवकरात लवकर करणे विशेषतः करदात्यांसाठी व सर्व भारतीयांसाठी अनिवार्य असणार आहे. जर वेळेवर ही प्रकिया पूर्ण न केल्यास मात्र त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात असे सरकारने म्हटले आहे. याशिवाय १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी आधार कार्ड आधारित ज्यांचे पॅनकार्ड इश्यू केले गेले असले तरी अशांना मुदतपूर्व आधार पॅन लिंक करण्याचे आवाहन वित्त मंत्रालयाने केले आहे. आपल्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, जल तुम्ही मुदतपूर्व दोन्ही कार्ड लिंक केले नाहीत तर तुम्हाला आरटीआर (Income Tax Returns ITR) फाईल अथवा भरता येणार नाही तसेच उर्वरित प्रकिया होणार नाही.


त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही वाढू शकते. जर तुमचे पॅन खाते यापूर्वीच निष्क्रीय असेल तर तुम्हाला १००० रुपयांची फी भरावी लागणार आहे. वेळेत लिंक न केल्यास टीडीएस, टीसीएसपण अधिकचा भरावा लागणार आहे. तसेच अर्ज २६ AS (Form 26AS) मध्ये क्रेडिट दाखवले जाणार नाही असे मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.


त्यामुळे लवकरात लवकर आधार पॅन जोडण्यासाठी (Link) इन्कम टॅक्स खात्याच्या ई फायलिंग पोर्टलवर तुम्ही भेट देऊ शकता. इतर माहिती भरत ओटीपीसह ती पडताळणी पूर्ण झाल्यावर दोन्ही कार्ड लिंक होतील. त्यामुळेच मुदत संपवून निष्क्रीय खात्यासाठी अधिकचे १००० रुपये फी भरण्यापेक्षा वेळेत जोडणी करणे करदात्यांना किफायतशीर ठरणार आहे.


त्यामुळे काय काळजी घ्यावी?


अधिकचा दंड न बसण्यासाठी वेळेत आधार पॅन जोडणी प्रकिया पूर्ण करावी


शेवटच्या मिनिटापर्यंत जोडणीसाठी ताटकळत बसू नये कारण तांत्रिक अडचणीचाही सामना करावा लागू शकतो.


सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपली माहिती व कागदपत्रे पहिले तपासून घ्यावी.


तांत्रिकदृष्ट्या चुका टाळाव्यात.


घाईघाईत आयटीआर व आधार पॅन जोडणी टाळावी.


इन्कम टॅक्स रिटर्न पोर्टलवर आधी संपूर्ण माहिती वाचून काढावी जेणेकरून तुमची प्रकिया चुकणार नाही.

Comments
Add Comment

भारतातून अफगाणिस्तानला ७३ टन मदत रवाना

नवी दिल्ली : पाकिस्तान वारंवार अफगाणिस्तानवर हल्ले करत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अफगाणिस्तानला ७३ टन मदत

Rajesh Aggarwal : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव, चार अधिकाऱ्यांची संधी हुकली

मुंबई : राजेश अगरवाल महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सोमवार १ डिसेंबर २०२५ पासून पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील ७५ गावं स्मार्ट होणार; गावात सीसीटीव्ही, वाय-फाय, डिजिटल शिक्षण व्यवस्था उपलब्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गावांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची गंगा पोहोचावी यासाठी राज्य सरकार अभिनव उपक्रम राबवत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील; प्रचार रंगत असतानाच काँग्रेस आणि पवार गटाला धक्का

राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च

एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होणार

सूरत : एक्सप्रेस वे मुळे दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत करता येईल. सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकर पूर्ण

गोव्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७७ फुटी रामाच्या मूर्तीचे अनावरण

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात रामाच्या जगातील सर्वात उंच ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले .