भाजपला नवा अध्यक्ष मिळणार, राजनाथ सिंहांनी काय सांगितले?

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि राष्ट्रसेवा शिकवतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की संघ आणि पक्ष यांच्यातील संबंध परस्पर सन्मानावर आधारित आहेत.


बिहारमधील राजकीय समीकरणांवर बोलताना सिंह यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की एनडीए पुन्हा एकदा सत्तेवर येईल. जनतेचा कल पाहता असे वाटते की एनडीए सरकार बनवेल आणि दोन-तृतीयांश बहुमत मिळण्याचीही शक्यता असल्याचे राजनाथ म्हणाले.


बिहारमध्ये नीतीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत आणि निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


बिहार विधानसभा निवडणुका २ टप्प्यांत होत आहेत पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी झाला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. निकालांची घोषणा १४ नोव्हेंबर रोजी होईल.


राजनाथ सिंह यांनी निवडणूक रणनीतिकार ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या प्रशांत किशोर आणि त्यांच्या ‘जन सुराज’ पक्षावरही प्रतिक्रिया दिली. “प्रशांत किशोर यांचा विशेष प्रभाव नाही आणि त्यांच्यावर जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. जनता ओळखते की कोण खरोखर सरकार बनवण्यासाठी निवडणूक लढतो आणि कोण केवळ मतविभाजनासाठी,” असे ते म्हणाले. त्यांनी असा अंदाजही व्यक्त केला की ‘जन सुराज’ पक्षाला एकही जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.


बिहार विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर भाजपला नवा अध्यक्ष मिळेल असे संकेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. तसेच पक्षांतर्गत कुठलेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

डॉक्टर होता की कसाई, लॉकरमध्ये सापडली एके-४७ रायफल

श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला

Viral Video : धावत्या बसमध्ये तरुणीचा विनयभंग! आधी मांडीवरून हात फिरवला, मग टीशर्टमध्ये हात घातला अन्...संतापजनक व्हिडिओ व्हायरल

केरळ : महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना केरळ

Google Maps new features : हँड्स-फ्री ड्रायव्हिंग! जेमिनी AI सह गुगल मॅप्समध्ये १० नवीन फीचर्स; काय आहे खास? जाणून घ्या

नवी दिल्ली : तुमच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलण्यासाठी, गुगलने मॅप्समध्ये जेमिनी AI सह तब्बल १० नवीन

वंदे मातरम् इतिहास नाही; देशाच्या अस्तित्वाची ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘वंदे मातरम् हे शब्द आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्याला हे शब्द बळ

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक