भाजपला नवा अध्यक्ष मिळणार, राजनाथ सिंहांनी काय सांगितले?

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि राष्ट्रसेवा शिकवतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की संघ आणि पक्ष यांच्यातील संबंध परस्पर सन्मानावर आधारित आहेत.


बिहारमधील राजकीय समीकरणांवर बोलताना सिंह यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की एनडीए पुन्हा एकदा सत्तेवर येईल. जनतेचा कल पाहता असे वाटते की एनडीए सरकार बनवेल आणि दोन-तृतीयांश बहुमत मिळण्याचीही शक्यता असल्याचे राजनाथ म्हणाले.


बिहारमध्ये नीतीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत आणि निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


बिहार विधानसभा निवडणुका २ टप्प्यांत होत आहेत पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी झाला आणि दुसरा टप्पा ११ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. निकालांची घोषणा १४ नोव्हेंबर रोजी होईल.


राजनाथ सिंह यांनी निवडणूक रणनीतिकार ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या प्रशांत किशोर आणि त्यांच्या ‘जन सुराज’ पक्षावरही प्रतिक्रिया दिली. “प्रशांत किशोर यांचा विशेष प्रभाव नाही आणि त्यांच्यावर जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. जनता ओळखते की कोण खरोखर सरकार बनवण्यासाठी निवडणूक लढतो आणि कोण केवळ मतविभाजनासाठी,” असे ते म्हणाले. त्यांनी असा अंदाजही व्यक्त केला की ‘जन सुराज’ पक्षाला एकही जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.


बिहार विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर भाजपला नवा अध्यक्ष मिळेल असे संकेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. तसेच पक्षांतर्गत कुठलेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या