कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला. या साखरपुड्याच्या सोहळ्याबद्दल आता चर्चा रंगू लागली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून अनावश्यक लग्नातील खर्चावर टीका करणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा आरोप मुंबई डब्बेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केला.


या सगळ्या वादावर इंदुरीकर महाराज यांनी कार्यक्रमातच स्पष्टीकरण दिल. मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी त्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला.


कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर जवळ असलेल्या 'वसंत लॉन्स' येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र शाही सोहळ्याच्या खर्चावरून इंदुरीकर महाराजांवर तीव्र टीका सुरु झाली आहे.


लोकांना दखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुलामुलींचे लग्न मोठ्या थाटात करू नका, लग्न साध्य पद्धतीने करा, सध्या पद्धतीने लग्न केलं तरी मुलं होतात. असा सल्ला इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनातून दिला होता. दुसरीकडे, दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात अशी टिका मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.


मात्र इंदुरीकर महाराज यांना अश्या प्रकारची टीका टीका होणार हे माहित असल्याने त्यांनी कार्यक्रमात याबाबत स्पष्टीकरण दिलं. "वीस वर्ष लोकांनी नाव ठेवली तेच सहन करत आलो. पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा ठरवला आहे. करायचा तर सगळ्यांचा नाहीतर एकाचाही नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस हा वारकऱ्या सारखा ठेवला. सगळ्यांना सामान वागणूक. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खुर्ची नाही. फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवले. कोणाला कमी पाहिलं नाही कोणाची स्तुती केली नाही, कोणाची निंदा केली नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो, " असं स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिल. "व्याही भेट हा कार्यक्रम देखील बंद करून टाकला आहे. तुम्हाला नाव ठेवायचं तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे. "असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.

Comments
Add Comment

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची