बुरखा घालून १४ वेळा मतदान करण्याला आक्षेप नाही ?

मंत्री नितेश राणे यांचा नाशिकमध्ये विरोधकांना सवाल


नाशिक  : विधानसभा निवडणुकीनंतरच विरोधकांकडून मतबंदीचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? लोकसभा निवडणुकीत १४ वेळा बुरखा घालून मतदान झाले, तेव्हा का विचारले नाही? बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला होत्या का, हा प्रश्न कुणी विचारला का? मोहम्मद अली रोडवर किती बोगस मतदार आहेत, त्याबद्दल का बोलले जात नाही? दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यावेळी या विषयावर का काही विचारले नाही, असा सवाल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केला.मंत्री राणे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


नितेश राणे म्हणाले की, मत्स्य उत्पादन व व्यवसाय कसा सुरू आहे. कृषी दर्जा मिळाल्यानंतर विभागाचे कामकाज कसे सुरू आहे, याचा मी जिल्हानिहाय आढावा घेत आहे. त्या अानुषंगाने ही बैठक घेण्यात आली. पार्थ पवार कंपनीच्या जमीन प्रकरणाबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले की, या प्रकरणाची अद्याप मला माहिती मिळालेली नाही. या संदर्भात भाजप नेते निर्णय घेतील.


प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवरील टीकेबाबत बोलताना राणे म्हणाले की, आमच्या कीर्तनकारांवर वारंवार टीका केली जाऊ नये. मुस्लीम देशभक्तांबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही; पण जिहादी विचारांचे ‘हिरवे साप’ आहेत, त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे. मौलाना डुप्लिकेट विषय असतो, कारण ते पूर्वी हिंदूच होते, असा उल्लेख त्यांनी केला.



भांडुपचा देव आनंद लवकर टीव्हीसमोर यावा


संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना मंत्री राणे म्हणाले की, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ही आमची इच्छा आहे. आमची जुगलबंदी सुरू असते, त्यामुळे भांडुपचा देवानंद पुन्हा लवकर टीव्हीसमोर यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकाने पाहिजेत


नाशिक, त्र्यंबकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात फक्त हिंदूंची दुकाने लागली पाहिजेत, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले. आम्ही मस्जिदबाहेर दुकान लावतो का? जर आमचे नियम मान्य नसतील, तर मग इथे राहू नका. कुंभमेळ्यात हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत, ही मागणी नाही, तर हे झालेच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Comments
Add Comment

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा