बीकेसीच्या धर्तीवर वडाळ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र

एमएमआरडीए करणार १५० एकर जागेचा विकास

मुंबई  : वडाळ्यातील आपल्या मालकीच्या १५० एकर जागेचा विकास वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार येथील भूखंडांचा ई लिलाव करून येथे व्यावसायिक आणि काही प्रमाणात निवासी संकुले उभारण्यात येणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीला अखेर एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. वडाळ्यातील भूखंड क्रमांक ४० चा ई लिलाव करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. हा भूखंडाचे क्षेत्रफळ १०८६० चौरस मीटर असून या भूखंडावरील अनुज्ञेय बांधकाम १,०८,६०० चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. पात्र निविदाकाराला या भूखंडाचे ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे.

एमएमआरडीए वडाळा येथील भूखंड क्रमांक ४० चा ई लिलाव करण्यासाठी गुरुवारी निविदा प्रसिद्ध केली. १०८६० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला जाणार असून या ई लिलावातून एमएमआरडीएला किमान १६२९ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारने चार महानगरांचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एमएमआर क्षेत्राचा समावेश आहे.

१५ वर्षांनंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव :


निविदेनुसार या भूखंडाच्या ई लिलावासाठी १,५०,००० रुपये प्रति चौरस मीटर असे राखीव दर निश्चित करण्यात आले आहेत. या राखीव दरानुसार एमएमआरडीएला या भूखंडाच्या ई लिलावातून किमान १६२९ कोटी रुपये इतका महसूल मिळणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएने २००८ मध्ये वडाळ्यातील दोन भूखंडांच्या ई लिलाव करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र आर्थिक मंदीमुळे या ई लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने २०१० मध्ये याच भूखंडांसाठी पुन्हा ई निविदा काढल्या आणि त्यास प्रतिसाद मिळाला. लोढा समूहाने ४०५३ कोटी रुपयांत भूखंड खरेदी केले आणि त्यावर न्यू कफ परेड नावाने टाऊनशीप उभारली. आता १५ वर्षांनंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव करण्यात येणार आहे.

वडाळ्यातील भुखंड विक्रीमुळे एमएमआरडीए होणार मालामाल, ई-लिलावातून १६०० कोटींहून अधिकचा महसूल मिळणार,  भुखंड विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध , व्यावसायिक आणि निवासी संकुले उभारण्यात येणार
Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध