नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदाआरती


नाशिक : भगवा कुर्ता परिधान करुन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गोदावरीची अर्थात महाराष्ट्रातल्या गंगेची आरती केली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने या गोदाआरतीचे आयोजन केले होते. या प्रसंगी जय देवी सूरसरिते गोदावरी माता’ या सुरांनी परिसर दुमदुमून गेला आणि सियावर रामचंद्र की जय, फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट अशा भगव्या वातावरणाने आसमंत भरुन गेला.


आरतीनंतर मार्गदर्शन करताना मंत्री राणे म्हणाले की, “गोदा आरतीचे इतक्या भव्य स्वरूपात आयोजन पाहून कुंभमेळा आता होत असल्याचा भास होत आहे. आरतीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही अभिमानाची बाब आहे.” भारतीय संस्कृती महान असून, ती टिकवण्यासाठी राजाश्रयाची गरज आहे“सनातन धर्म श्रेष्ठ आहे आणि तो लोकांच्या परिश्रम व श्रद्धेमुळे टिकून आहे. येत्या कुंभमेळ्यात नाशिकचे महाकुंभ आयोजन जगाला आश्चर्यचकित करेल, असा मला विश्वास आहे. “आरती ही केवळ विधी नसून ती श्रद्धा आणि संतज्ञानाचा संगम आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि नदीचे शुद्धीकरण हे आपले कर्तव्य आहे. जल, मंत्र आणि प्राणायाम यांमुळे मन व शरीराचे शुद्धीकरण होते. त्यामुळे चिंतामुक्त व्हावे असे आवाहनही राणे यांनी केले.


यावेळी समितीच्यावतीने मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. महाआरतीपूर्वी झालेल्या सत्संगात ‘अंबे जगदंबे जय अंबे’, ‘भोले की जय जय’, ‘जय शिवशंकर हर हर शंकर’ यांसारख्या भजनांनी धार्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले.यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी,सुधाकर बडगुजर,सुरेश पाटील, व्यंकटेश मोरे,राजेंद्र फड, खोचे गुरुजी, जयंत गायधनी यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.





Comments
Add Comment

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Shalarth ID Scam : काेट्यवधींच्या मालमत्तेवर टाच बसणार ! १६० कोटींच्या अपहारातून घेतलेली मालमत्ता ‘शासनजमा’ होणार

Shalarth ID Scam : नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील कोट्यवधींच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात महत्त्वाची माहिती समोर येत

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत