नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदाआरती


नाशिक : भगवा कुर्ता परिधान करुन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गोदावरीची अर्थात महाराष्ट्रातल्या गंगेची आरती केली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने या गोदाआरतीचे आयोजन केले होते. या प्रसंगी जय देवी सूरसरिते गोदावरी माता’ या सुरांनी परिसर दुमदुमून गेला आणि सियावर रामचंद्र की जय, फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट अशा भगव्या वातावरणाने आसमंत भरुन गेला.


आरतीनंतर मार्गदर्शन करताना मंत्री राणे म्हणाले की, “गोदा आरतीचे इतक्या भव्य स्वरूपात आयोजन पाहून कुंभमेळा आता होत असल्याचा भास होत आहे. आरतीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही अभिमानाची बाब आहे.” भारतीय संस्कृती महान असून, ती टिकवण्यासाठी राजाश्रयाची गरज आहे“सनातन धर्म श्रेष्ठ आहे आणि तो लोकांच्या परिश्रम व श्रद्धेमुळे टिकून आहे. येत्या कुंभमेळ्यात नाशिकचे महाकुंभ आयोजन जगाला आश्चर्यचकित करेल, असा मला विश्वास आहे. “आरती ही केवळ विधी नसून ती श्रद्धा आणि संतज्ञानाचा संगम आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि नदीचे शुद्धीकरण हे आपले कर्तव्य आहे. जल, मंत्र आणि प्राणायाम यांमुळे मन व शरीराचे शुद्धीकरण होते. त्यामुळे चिंतामुक्त व्हावे असे आवाहनही राणे यांनी केले.


यावेळी समितीच्यावतीने मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. महाआरतीपूर्वी झालेल्या सत्संगात ‘अंबे जगदंबे जय अंबे’, ‘भोले की जय जय’, ‘जय शिवशंकर हर हर शंकर’ यांसारख्या भजनांनी धार्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले.यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी,सुधाकर बडगुजर,सुरेश पाटील, व्यंकटेश मोरे,राजेंद्र फड, खोचे गुरुजी, जयंत गायधनी यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.





Comments
Add Comment

Stock Market Opening Bell: सकाळच्या सत्रात जागतिक पडझडीचे परिणाम कायम आज नफा बुकिंग होणार? सेन्सेक्स ५४३.२७ व निफ्टी २५१.६५ अंकांनी घसरला

आयटी रिअल्टी शेअर्समध्ये मोठी घसरण मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात मोठी घसरण

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ४ नव्या 'वंदे भारत' ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी वाराणसीतून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

पंतप्रधान मोदींचा 'जंगलराज'वरून थेट हल्ला

राजदचे १५ वर्ष म्हणजे 'अंधारयुग'!  अररिया : बिहारमध्ये मतदानाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६४.६६ टक्के मतदान

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज विधानसभेच्या एकूण २४३ पैकी १२१ मतदारसंघांमध्ये मतदान

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :