मुंबई, विदर्भ,मराठवाड्यात थंडीची चाहूल

राज्यभरात तापमान कमी होणार


मुंबई  : राज्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. अजूनही काहींमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली तरी आता तापमानामध्ये घट होण्यास सुरुवात होणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसानंतर अखेर मुंबईसह, विदर्भ मराठवाड्यात थंडीची चाहूल लागणार आहे.


भारतीय व हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ ते ७ नोव्हेंबरपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान ४ ते ५ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात स्पष्ट बदल जाणवेल. मात्र पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण व गोवा भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हवामान अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन दिवसांत किमान तापमान दोन ते चार अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावर गोंगावणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती धूसर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्रात किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घटणार आहे. तसेच पाऊस जाणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई उपनगरासह कोकणपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. हवेत आर्द्रता व ओलावा कायम होता.

Comments
Add Comment

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि