BSE Stock Surge: निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर बीएसई शेअर ८% उसळला

प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) बद्दल केलेल्या वक्तव्यावर शेअर बाजाराने बीएसई (Bombay Stock Exchange BSE)शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. सकाळी सत्र सुरूवातीला शेअर ४% व दुपारपर्यंत ८% पातळीवर उसळला आहे. विशेषतः कालच्या वक्तव्यानंतर शेअर बुलिश पँटर्नवर गेल्याचे स्पष्ट झाले. काल निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात एफ अँड ओ वरील बंदीचा कुठलाही विचार नसल्याचे अथवा निर्बंध घालण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र याविषयी गुंतवणूकदारांमध्ये सजगता आवश्यक आहे असे म्हटले आहे.


डेरीएटीव गुंतवणूकीत गुंतवणूकदारांना रोखण्याचा विचार नाही असे सीतारामन म्हणाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भाग घेताना डेरिएटीव प्रकारातील गुंतवणूकीत जोखीम लक्षात घेण्याची गरज असल्याचेही विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले. 'सजगता' अत्यंत महत्वाची असल्याचे निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या सकारात्मक विधानानंतर डेरिएटिव गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यामध्ये आज बाजारात मोठा प्रतिसाद बीएसई शेअरला मिळाला आहे. दुपारी १.५६ वाजेपर्यंत शेअर्समध्ये थेट ८% उसळत २६५१.८० पातळीवर पोहोचला आहे.


सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ९१% वैयक्तिक एफ अँड ओ व्यापाऱ्यांना निव्वळ तोटा झाला आहे. जो एकूण १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. अहवालात असे नुकसान अन्यथा जबाबदार गुंतवणूक आणि दीर्घकालीन भांडवल निर्मितीला कारणीभूत ठरू शकले असते असे अधोरेखित करण्यात आले आहे.हेजिंग, सट्टेबाजी आणि मध्यस्थीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या एफ अँड ओ साधनांमध्ये उच्च जोखीम असते. गुंतवणूकदारांना बाजाराची स्पष्ट समज आवश्यक असते. वाढत्या सट्टेबाजीला तोंड देण्यासाठी, बाजारात सेबीने यापूर्वी स्थिती मर्यादा आणि मार्जिन आवश्यकतांबद्दल कडक नियम लागू केले होते. आतापर्यंत बीएसई शेअरने बाजारात चांगली कामगिरी केली आहे.


उपलब्ध माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून या शेअरने १४% परतावा दिला असून महिन्यातील आधारे २०% घसरण झाली आहे. तर या आर्थिक वर्षात शेअरने गुंतवणूकदारांना ६१% परतावा (Returns) दिले आहेत.

Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची