BSE Stock Surge: निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर बीएसई शेअर ८% उसळला

प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) बद्दल केलेल्या वक्तव्यावर शेअर बाजाराने बीएसई (Bombay Stock Exchange BSE)शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. सकाळी सत्र सुरूवातीला शेअर ४% व दुपारपर्यंत ८% पातळीवर उसळला आहे. विशेषतः कालच्या वक्तव्यानंतर शेअर बुलिश पँटर्नवर गेल्याचे स्पष्ट झाले. काल निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात एफ अँड ओ वरील बंदीचा कुठलाही विचार नसल्याचे अथवा निर्बंध घालण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र याविषयी गुंतवणूकदारांमध्ये सजगता आवश्यक आहे असे म्हटले आहे.


डेरीएटीव गुंतवणूकीत गुंतवणूकदारांना रोखण्याचा विचार नाही असे सीतारामन म्हणाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भाग घेताना डेरिएटीव प्रकारातील गुंतवणूकीत जोखीम लक्षात घेण्याची गरज असल्याचेही विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केले. 'सजगता' अत्यंत महत्वाची असल्याचे निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या सकारात्मक विधानानंतर डेरिएटिव गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यामध्ये आज बाजारात मोठा प्रतिसाद बीएसई शेअरला मिळाला आहे. दुपारी १.५६ वाजेपर्यंत शेअर्समध्ये थेट ८% उसळत २६५१.८० पातळीवर पोहोचला आहे.


सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार,आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ९१% वैयक्तिक एफ अँड ओ व्यापाऱ्यांना निव्वळ तोटा झाला आहे. जो एकूण १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. अहवालात असे नुकसान अन्यथा जबाबदार गुंतवणूक आणि दीर्घकालीन भांडवल निर्मितीला कारणीभूत ठरू शकले असते असे अधोरेखित करण्यात आले आहे.हेजिंग, सट्टेबाजी आणि मध्यस्थीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या एफ अँड ओ साधनांमध्ये उच्च जोखीम असते. गुंतवणूकदारांना बाजाराची स्पष्ट समज आवश्यक असते. वाढत्या सट्टेबाजीला तोंड देण्यासाठी, बाजारात सेबीने यापूर्वी स्थिती मर्यादा आणि मार्जिन आवश्यकतांबद्दल कडक नियम लागू केले होते. आतापर्यंत बीएसई शेअरने बाजारात चांगली कामगिरी केली आहे.


उपलब्ध माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून या शेअरने १४% परतावा दिला असून महिन्यातील आधारे २०% घसरण झाली आहे. तर या आर्थिक वर्षात शेअरने गुंतवणूकदारांना ६१% परतावा (Returns) दिले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने