वंदे मातरम् गीताच्या कार्यक्रमाकरता भाजपकडून अबू आझमी यांना निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त मुंबई भाजप तर्फे मुंबईमध्ये शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त सहा ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. यातील ईशान्य मुंबईतील कार्यक्रम मानखुर्द पी एम जी पी कॉलनीत होणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना दिले आहे.


भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी आझमी यांना पत्र पाठवून या कार्यक्रमाला निमंत्रित राहण्याचे कळवले आहे. साटम यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, शुक्रवारी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रगीत "वंदे मातरम्" या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने वंदे मातरम् गीताच्या कथनाचा एक विशेष कार्यक्रम आपल्याच घराजवळच सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.


वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत देशभक्ती, एकता आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. आपण सुद्धा या गीताचे कथन व गायन आमच्यासोबत करावे, या करिता सदर कार्यक्रमाला मी आपणास निमंत्रित करत आहे. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून वंदे मातरम् कथनामध्ये सहभागी व्हाल, अशी अपेक्षा आहे,असे म्हटले आहे.



अबू आझमी यांनी वंदे मातरम् गीत शाळांमध्ये म्हणण्यास जाहीर विरोध केला आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना निमंत्रित केल्याचे बोलले जात आहे .

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील