जे निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीवर बोलणार; नमो केंद्रावरून राजकीय वादंग!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं वादळ उठलंय. प्रश्न हा आहे की, फक्त तोडण्याची भाषा करणाऱ्यांना राजकारणात स्थान आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गडकिल्ल्यांवरील 'नमो केंद्रा'वरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता थेट आणि धारदार टीका केलीय. पहिल्यांदाच शिंदेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय, आणि त्यांची ही टीका अत्यंत रोखठोक आहे.


राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर 'नमो केंद्रां'ची उभारणी करण्याची योजना आखलीय. पर्यटकांना माहिती आणि अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात हा यामागचा उद्देश. पण याच केंद्रांना राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आणि ते केंद्र फोडून टाकण्याचा इशारा दिला. हा इशारा देताच खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुलढाणा येथे राज ठाकरेंवर पलटवार केला.



शिंदे म्हणाले, 'राज ठाकरे नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा देतात, कारण त्यांच्याकडून आजवर काहीही चांगले झालेले नाही.' त्यांचा थेट आरोप आहे की, "जे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीची भाषा करणार. हे केंद्र केवळ पर्यटकांना माहिती देण्यासाठी आहेत, एवढी आगपाखड करण्याची गरज काय? महायुती सरकारने गडकिल्ले आणि मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं मोठं काम केलंय. त्यामुळे नरेंद्र मोदींचं कौतुक करण्याऐवजी, ते फोडण्याची भाषा करतात. विशेष म्हणजे, कधीकाळी याच लोकांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं.
नवनिर्माण करणाऱ्यांना बाजूला सारून तोडफोडीची भाषा करणारे खरंच लोकांमध्ये स्थान मिळवतील का? केवळ विरोधासाठी विरोध करण्याची ही खेळी महाराष्ट्रातील सुजाण मतदार स्वीकारणार का? राजकारणाचा खरा रोख कोणता आहे, विकास की विध्वंस?

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य