बिहार निवडणूक : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असलेले 'हे' मतदारसंघ आहेत बिहारच्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान होणार असून साधारण ३७.५ दशलक्ष मतदार १ हजार ३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत तारापूर, राघोपूर, महुआ, अलीनगर आणि मोकामा या सर्वाधिक चर्चेत असलेल्या जागा आहेत.



तारापूर, राघोपूर, महुआ, अलीनगर आणि मोकामा या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमदेवारांचे चेहरे बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे आहेत. यात सर्वात महत्त्वाची जागा राघोपूर आहे. राघोपूर येथे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या सतीश कुमार यादवांचे आव्हान आहे.



मोकामा मतदारसंघ ही सर्वाधिक चर्चेत असलेली दुसरी महत्त्वाची जागा आहे. दुलारचंद यादव यांच्या हत्येमुळे हा मतदारसंघ अत्यंत चुरशीच्या राजकीय संघर्षाचे केंद्र झाला आहे. या मतदारसंघातून माजी आमदार अनंत सिंह आणि आरजेडीच्या वीणा देवी यांच्यात लढत आहे.



तारापूर मतदारसंघात बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि आरजेडीचे अरुण कुमार यांच्यात सामना आहे. ही जागा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.



महुआ मतदारसंघात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव, आरजेडीचे मुकेश कुमार रोशन आणि लोक जनशक्ती पक्षाचे संजय सिंह यांच्यात चुरस होणार आहे.



तर पाचवा मतदारसंघ आहे अलीनगर. या ठिकाणी पहिल्यांदाच लोकगायिका मैथिली ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राजकारणातल्या अनुभवात नवीन असून थेट विधानसभेचे तिकीट दिल्यामुळे मैथिली ठाकूर चर्चेत आल्या आहेत. त्यांच्यासमोर आरजेडीचे विनोद मिश्रा यांचे आव्हान आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या