बीडीडीतील ८४६ रहिवाशांना आठवड्याभरात मिळणार घरे

पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार


मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील घरांच्या चाव्या मिळाल्या आहेत. त्यानंतर आता आणखी ८४६ जणांना पुढील आठवड्यात घरांच्या चाव्या मिळणार आहेत. दादर येथील नायगाव बीडीडी चाळीतील १६० चौरस फुटांच्या घरांत राहणाऱ्या रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गंत असलेल्या पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार झाल्या आहेत.


वरळी, नायगाव आणि ना.म.जोशी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. येथील इमारतींना अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहेत. नायगाव येथील ४२ चाळींचा पुनर्विकास केला जातोय. यातील ३ हजार ३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० इमारतीत केले जाणार आहे. येथील दोन टप्प्यात काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आठ तर दुसऱ्या टप्प्यात १२ इमारती बांधल्या जाणार आहेत.


ना.म.जोशी मार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे. डिसेंबरमध्ये ३४२ रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम सुरू आहे. सातपैकी दोन इमारतींचे काम झाले असून ३४२ रहिवाशांना येत्या डिसेंबरपर्यंत ताबा देण्यात येणार आहे. तर, पाच इमारतीतील रहिवाशांना मार्च २०२६ नंतर ताबा मिळणार आहे.


बीडीडी चाळ पुनर्विकासप्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून येथील ५५६ रहिवाशांना चावी वाटप करण्यात आले आहे. वरळी पुनर्विकास प्रकल्पात वरळी येथे ९,६८९ पुनर्वसन सदनिका (९,३९४ निवासी + २९५ अनिवासी), नायगाव येथे ३,३४४ सदनिका आणि ना.म.जोशी मार्ग येथे २,५६० सदनिकांचे बांधकाम हाती घेण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यातील ५५६ घरांच्या चाव्या १४ ऑगस्ट रोजी वाटप करण्यात आल्या. या सदनिका ५०० चौरस फुटांच्या असून, दोन ४० मजली इमारतींमध्ये बांधल्या गेल्या आहेत.


बीडीडी (बॉम्बे डेव्हलपमेंट डायरेक्टोरेट) चाळ पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील वरळी, नायगाव, आणि ना. म. जोशी मार्ग येथील जुन्या चाळींचा पुनर्विकास करण्याचा महाराष्ट्र शासनाचा आणि म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकासप्राधिकरण) यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत १६० चौरस फुटांच्या जुन्या खोल्यांऐवजी रहिवाशांना ५०० चौरस फुटांच्या आधुनिक २ बीएचके सदनिका मोफत दिल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री

Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या आदई आणि नेवाळी येथील दगडखाणींमुळे स्थानिक ग्रामस्थांना