विमान तिकीट रद्द केल्यास २१ दिवसात पैसे परत मिळणार

मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत मिळवण्यासाठी करावी लागणारी डोकेफोड आता लाकरच दूर होणार आहे , विमान तिकीट बुकिंग केल्यांनतर ते ४८ तासात रद्द केल्यास प्रवाश्याना कोणताही भुर्दंड सोसावा लागणार नाही. या कालावधीत तिकीट रद्द किंवा त्यात बदलही करता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकाने (डीसीजीए) यांनी हा बदल प्रस्तावित केला आहे.

विमान कंपनीच्या संकेत स्थळावरून तिकीट बुक करून रद्द केल्यास रकमेचा परतावा हा कार्यालयीन २१ दिवसाच्या आत प्रवाश्याना मिळणार आहे. ट्रॅव्हल एजन्ट किंवा पोर्टलद्वारे तिकटी खरेदी केल्यास परताव्याची जबाबदारी संबंधित एरलाईन्सवर राहील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.


बुकिंग तारीखेपासून देशांतर्गत उड्डाणासाठी ५ दिवसांपेक्षा कमी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला असेल तर या सुविधेचा वापर करता येणार नाही, वापर करायचा असल्यास अधिक पैसे मोजावे लागतील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.


'डीसीजीए'ने असा निर्णय का घेतला ?


दोन वर्षांपासून देशात विमान प्रवाश्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत विमानाच्या संख्येत असलेली तफावत यामुळे प्रवासाचे दर वर्षभर गगनाला भिडलेले दिसतात. अश्या स्थितीत विमान तिकीट रद्द झाले तर कंपन्या घसघशीत शुल्क आकारणी करतात आणि प्रवाशाच्या अधिक पैसे जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशाचे नुकसान होऊ नये याकरिता हा प्रस्ताव डीसीजीए सर्व विमान कंपन्यांसमोर मांडणार आहे.

Comments
Add Comment

गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि

प्रशासनात खांदेपालट, ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात खांदेपालट करत चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विविध

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व

राष्ट्रवादीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांकडून 'दादांच्या' अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन...

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता

BMC Election 2026: भाजप - शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार

मुंबई: आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई