विमान तिकीट रद्द केल्यास २१ दिवसात पैसे परत मिळणार

मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत मिळवण्यासाठी करावी लागणारी डोकेफोड आता लाकरच दूर होणार आहे , विमान तिकीट बुकिंग केल्यांनतर ते ४८ तासात रद्द केल्यास प्रवाश्याना कोणताही भुर्दंड सोसावा लागणार नाही. या कालावधीत तिकीट रद्द किंवा त्यात बदलही करता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकाने (डीसीजीए) यांनी हा बदल प्रस्तावित केला आहे.

विमान कंपनीच्या संकेत स्थळावरून तिकीट बुक करून रद्द केल्यास रकमेचा परतावा हा कार्यालयीन २१ दिवसाच्या आत प्रवाश्याना मिळणार आहे. ट्रॅव्हल एजन्ट किंवा पोर्टलद्वारे तिकटी खरेदी केल्यास परताव्याची जबाबदारी संबंधित एरलाईन्सवर राहील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.


बुकिंग तारीखेपासून देशांतर्गत उड्डाणासाठी ५ दिवसांपेक्षा कमी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला असेल तर या सुविधेचा वापर करता येणार नाही, वापर करायचा असल्यास अधिक पैसे मोजावे लागतील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.


'डीसीजीए'ने असा निर्णय का घेतला ?


दोन वर्षांपासून देशात विमान प्रवाश्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत विमानाच्या संख्येत असलेली तफावत यामुळे प्रवासाचे दर वर्षभर गगनाला भिडलेले दिसतात. अश्या स्थितीत विमान तिकीट रद्द झाले तर कंपन्या घसघशीत शुल्क आकारणी करतात आणि प्रवाशाच्या अधिक पैसे जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशाचे नुकसान होऊ नये याकरिता हा प्रस्ताव डीसीजीए सर्व विमान कंपन्यांसमोर मांडणार आहे.

Comments
Add Comment

वाळू माफियांवर महसूलमंत्र्यांचा 'सर्जिकल स्ट्राईक'

मुंबई : गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई

न्यूमोनियामुळे श्वसनप्रणाली बंद झाल्याने ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील

मुंबईत दुबार, तिबार... १०३ बार मतदार

मुंबईत ४ लाख ३३ हजार मतदारांची नावे दुबार नोंद दुबार मतदारांची एकूण संख्या ११ लाख ०१ हजार दुबार मतदारांचा

Smriti Mandhana Palash Muchhal : धोका देणारी व्यक्ती मी नाही, 'मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा दाखवायचा होता'; मेरी डिकॉस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि लोकप्रिय म्युझिक

राणीबागेतील 'शक्ती' वाघाचा संशयास्पद मृत्यू! आठ दिवसांनंतर व्यवस्थापनाने केले उघड, का केली लपवाछपवी?

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेतून एक धक्कादायक

Mumbai Terror Attack : आग, धूर अन् रक्ताने माखलेली ती रात्र... २६/११ च्या भयावह रात्री 'या' ताज कर्मचाऱ्यांमुळे वाचले शेकडो जीव;

मुंबई : आजचा दिवस २६ नोव्हेंबर भारतीय आणि विशेषतः मुंबईच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि वेदनादायी दिवसांपैकी एक