विमान तिकीट रद्द केल्यास २१ दिवसात पैसे परत मिळणार

मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत मिळवण्यासाठी करावी लागणारी डोकेफोड आता लाकरच दूर होणार आहे , विमान तिकीट बुकिंग केल्यांनतर ते ४८ तासात रद्द केल्यास प्रवाश्याना कोणताही भुर्दंड सोसावा लागणार नाही. या कालावधीत तिकीट रद्द किंवा त्यात बदलही करता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकाने (डीसीजीए) यांनी हा बदल प्रस्तावित केला आहे.

विमान कंपनीच्या संकेत स्थळावरून तिकीट बुक करून रद्द केल्यास रकमेचा परतावा हा कार्यालयीन २१ दिवसाच्या आत प्रवाश्याना मिळणार आहे. ट्रॅव्हल एजन्ट किंवा पोर्टलद्वारे तिकटी खरेदी केल्यास परताव्याची जबाबदारी संबंधित एरलाईन्सवर राहील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.


बुकिंग तारीखेपासून देशांतर्गत उड्डाणासाठी ५ दिवसांपेक्षा कमी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला असेल तर या सुविधेचा वापर करता येणार नाही, वापर करायचा असल्यास अधिक पैसे मोजावे लागतील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.


'डीसीजीए'ने असा निर्णय का घेतला ?


दोन वर्षांपासून देशात विमान प्रवाश्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत विमानाच्या संख्येत असलेली तफावत यामुळे प्रवासाचे दर वर्षभर गगनाला भिडलेले दिसतात. अश्या स्थितीत विमान तिकीट रद्द झाले तर कंपन्या घसघशीत शुल्क आकारणी करतात आणि प्रवाशाच्या अधिक पैसे जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशाचे नुकसान होऊ नये याकरिता हा प्रस्ताव डीसीजीए सर्व विमान कंपन्यांसमोर मांडणार आहे.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील