Eknath Shinde : 'गुवाहाटी' उठावाची खरी स्क्रिप्ट माझ्याकडेच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; 'पुस्तक लिहायचं तर मला विचारूनच लिहावं लागेल!'

मुंबई : शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी करून 'गुवाहाटी' (Guwahati) गाठण्याच्या आणि त्यानंतर सत्तेत परतण्याच्या घटनेमागील 'खरी कथा' फक्त आपल्यालाच माहीत आहे, असे सूचक विधान (Suggestive Statement) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Eknath Shinde) यांनी केले आहे. भविष्यात यावर पुस्तक लिहिणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या 'दाही दिशा' या पुस्तक प्रकाशन समारंभात (Book Launch Event) एकनाथ शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले की, "शिवसेनेत उठाव करून आम्ही गुवाहाटीला पोहोचलो आणि तिथून परत आलो. यातील वरवरची कथा सगळ्यांना माहीत आहे. पण जर पुस्तक लिहायचे असेल, तर खरी कथा मलाच माहीत आहे. त्यासाठी माझ्याशी बोलावे लागेल." यावेळी शिंदे यांनी विरोधकांनाही त्यांच्या शैलीत जोरदार टोला लगावला, "राजकारणात काही जण दिशाहीन झाले आहेत. काही लोकांची आपल्यावर वाईट नजर आहे." शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य करत हिंदीतून केलेली शायरी चांगलीच चर्चेत राहिली. ते म्हणाले, "बुरी नजर वाले तेरा मुह काला, विधानसभा में धो डाला, अब पालिका इलेक्शन मे पडेगा फिर से पाला, लेकिन महायुती के गले मे ही पडेगी विजय की माला." या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), मराठी भाषा विभागमंत्री उदय सामंत (Uday Samant), अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf), आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी (Milind Joshi) आदी मान्यवर उपस्थित होते.



डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या 'दाही दिशा' पुस्तकाचे प्रकाशन


वक्त्यांच्या मते, 'समाजात अन्याय दिसला की तिथे धावून जाणे, दुर्बलांना आधार देत विकासाचा मार्ग दाखवणे' या तत्त्वाचे डॉ. गोऱ्हे हे जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी लिहिलेले 'दाही दिशा' हे पुस्तक म्हणजे त्यांच्या संघर्षाचा आणि विचारांचा नकाशा आहे. हे पुस्तक गोऱ्हे यांच्या संघर्ष, संवेदनशीलता आणि समाजसेवेच्या प्रवासाचा एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे. हा प्रवास केवळ राजकीय नसून, सामाजिक जागृतीचा प्रवास आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 'दाही दिशा' हे केवळ साहित्यिक काम नसून, महिलांच्या, वंचितांच्या व शोषितांच्या आवाजाला दिशा देणारे महत्त्वपूर्ण कार्य आहे, असे गौरवोद्गार याप्रसंगी काढण्यात आले.



'आरक्षण मिळाले, पण संरक्षण नाही'; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे स्पष्ट मत


डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या राजकीय स्थानावर भाष्य करताना आरक्षण आणि संरक्षण या मुद्द्यांवर आपले परखड मत मांडले. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर व्यक्त करत असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. गोऱ्हे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच; पण 'लाडकी बहीण' (Ladki Bahin) योजनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत." त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे यांच्या महिलाभिमुख (Women-centric) धोरणांचे कौतुक केले. राजकारणात महिलांना स्थान मिळाले असले तरी, त्यांच्या सुरक्षिततेचे व सक्षमीकरणाचे काम अजूनही बाकी असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्यांनी थेट आणि महत्त्वाचे विधान केले: "आरक्षण मिळाले; पण संरक्षण नाही. त्यासाठीचा संघर्ष अजून सुरू आहे." आपल्या 'दाही दिशा' या पुस्तकातील आशयाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, १९९५ ते २००५ या कालखंडातील महिला चळवळीतील संघर्ष, महत्त्वाचे धोरणे (Policies) आणि अनुभव त्यांनी या पुस्तकात प्रामाणिकपणे मांडले आहेत. डॉ. गोऱ्हे यांच्या या स्पष्ट विधानामुळे महिलांच्या समस्यांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे.



Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या