पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वन डे विश्वचषक 2025 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताचे नाव जगभरात गौरवाने झळकवले आहे. या अभूतपूर्व कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 5 नोव्हेंबर 2025 रोजी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेणार आहेत.


या विजयानंतर मोदींनी सोशल मीडियावर ट्विट करत संघाचे अभिनंदन केले . त्यांनी म्हटलं होतं , "या खेळाडूंनी कौशल्य, आत्मविश्वास आणि टीमवर्कच्या जोरावर इतिहास घडवला आहे. हा विजय भावी पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल". आता ते प्रत्यक्ष भेटीत संघाशी संवाद साधून त्यांना विशेष सन्मान प्रदान करतील. हा क्षण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गौरवशाली ठरणार आहे.


मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत खेळांना राष्ट्रनिर्माणाचा अविभाज्य भाग मानत अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला 3,794 कोटी रुपयांचे विक्रमी बजेट देण्यात आले आहे, जे 2014-15 च्या तुलनेत तब्बल 130 टक्क्यांनी अधिक आहे.


‘खेलो इंडिया’ आणि ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS)’ या योजना भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरल्या आहेत. TOPS अंतर्गत ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडूंना दरमहा 50,000 रुपये स्टायपेंड आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले जाते, तर ‘खेलो इंडिया’मुळे ग्रामीण भागातील प्रतिभेला मोठा मंच मिळाला आहे. आतापर्यंत 19 खेलो इंडिया स्पर्धा पार पडल्या असून 2781 पेक्षा जास्त खेळाडूंना थेट लाभ मिळाला आहे.


या उपक्रमांचा परिणाम म्हणून 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 107 पदके आणि पॅरालिम्पिकमध्ये 29 पदकांसह सर्वोत्तम कामगिरी केली. देशभरातील 1057 खेलो इंडिया केंद्रे, 34 उत्कृष्टता केंद्रे आणि ‘अस्मिता महिला लीग्स’मुळे महिलांचा खेळातील सहभाग झपाट्याने वाढला आहे.या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील क्रीडा संस्कृती नव्या उंचीवर पोहोचत आहे.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.