किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या सर्वांना आरक्षण दिले. पण लष्करात जाती-पातीच्या आधारावर आरक्षण? मला वाटते की, याची चर्चा देखील झाली नाही पाहिजे. आपल्या सैन्याच्या जवानांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे ‘सैन्य धर्म’, त्याव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म नसतो. राहुल गांधी हे संरक्षण दलांमध्ये आरक्षणाची मागणी करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की किमान आपल्या लष्कराला राजकारणात ओढू नका, असे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.


उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यादरम्यान प्रचार सभेत बोलताना सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर लष्कराला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि लष्करात विविध समाजांसाठी आरक्षणाची मागणी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका देखील केली.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्करावर केवळ १० टक्के लोकांचे नियंत्रण असल्याचे वक्तव्य केले आहे , यावरून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी त्यांच्यावर टीका केली. संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भारतीय लष्कराला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आऱोप केला. यावेळी त्यांनी , “सैन्याला कोणताही धर्म किंवा जात नसते,” असेही स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.

केदारनाथमधून बर्फ गायब; निसर्गाचा इशारा की हवामान बदलाचा परिणाम?

उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या