...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण पसरले आहे. याप्रकरणाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यात माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणातील आरोपीने एन्काऊंटरच्या आधी दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे असे पोलिसांना सांगितले. मात्र यावेळी केसरकरांनी नकार दिला होता. याबाबतची सविस्तर माहिती केसरकरांनी दिली आहे.


पवईत तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या ओलीस नाट्यादरम्यान घटनेतील मृत आरोपी रोहीत आर्यने पोलिसांना माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले होते. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने केसरकर यांना फोन करून परिस्थितीचा आढावा दिला. मात्र केसरकरांनी रोहीत आर्यसोबत बोलण्यास नकार दिला.




केसरकरांनी रोहीतसोबत बोलण्यास नकार का दिला, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. केसरकर यांना जेव्हा पोलिसांचा फोन आला तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले की, "जेव्हा मला कळले की हा मुद्दा थकबाकीशी संबंधित आहे, तेव्हा मी पोलिसांना सांगितले की ज्या विभागाकडे त्यांची थकबाकी प्रलंबित आहे त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी रोहीत आर्यचे बोलणे करू द्या. मला कल्पना नव्हती की हे प्रकरण इतके गंभीर होईल." यानंतर झालेल्या चकमकीत रोहीतचा एन्काऊंटर झाला. त्यामुळे या प्रकरणात आता केसरकरांचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडला गेला आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजपा नगरसेविकेने घेतला विरोधकांचा समाचार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्यावरून भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी विरोधकांचा चांगलाच

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली