Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार, मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्य सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) ही योजना सध्या सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी (Most Popular and Successful) योजना म्हणून ओळखली जाते. आता याच लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक मोठी आणि दिलासादायक घोषणा (Relief Announcement) केली आहे. महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडक्या बहिणींच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. तटकरे यांनी 'एक्स' (X) पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, ४ नोव्हेंबर (सोमवार) पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच २ ते ३ दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. यासोबतच, मंत्री तटकरे यांनी योजनेच्या KYC (ई-केवायसी) बद्दलही महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहावा यासाठी, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत त्यांनी जारी केली आहे. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. या घोषणेमुळे दिवाळीनंतर लांबणीवर गेलेला हप्ता अखेर खात्यात जमा होणार असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.



लाडक्या बहिणींसाठी दिवाळीनंतरची मोठी भेट; उद्यापासून सन्मान निधी वितरित


मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स' (X) पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!" त्यांनी माहिती दिली की, ऑक्टोबर महिन्याचा 'सन्मान निधी' वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून (५ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे. तटकरे यांनी महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने ही सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या सुरू असल्याचे नमूद केले. या वाटचालीस खंड पडू नये, यासाठी त्यांनी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नम्र विनंती केली आहे की, सर्व लाडक्या बहिणींनी १८ नोव्हेंबरच्या आधी या संकेतस्थळावर E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी (e-KYC) न केल्यास पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.



अशी करा e-KYC प्रक्रिया ?



  • लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्यावी.

  • लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.

  • तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) नोंदवा.

  • आता कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा.

  • आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करावे.

  • आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद आल्यावर तो Submit करावा.

  • त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील
    १. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
    २. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

  • शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक

Devendra Fadnavis : पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "

Jalgaon : जळगावच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ? शहरातील चार ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपास प्रस्तावाला नितीन गडकरींचा हिरवा कंदील

Jalgaon : जळगावकरांसाठी वाहतुकीबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीवर

Sunetra Pawar : आदिवासी हा विकासाचा लाभार्थी नव्हे, तर विकासाला दिशा देणारा समाज!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; ग्लोबल वॉर्मिगबाबतचा जीवनमंत्र आदिवासींनी शेकडो वर्षांपूर्वी दिला मुंबई :