नवी मुंबई विमानतळात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या मराठी भाषिकांनाच मिळाल्या पाहिजे

मनसेची सिडको आणि कौशल्य विकास, रोजगार विभागावर धडक


नवी मुंबई : नुकत्याच उद्घाटन झालेल्या दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक, मराठी भाषिक तरुणांनाच मिळाल्या पाहिजे, यासाठी मनसेने रणशिंग फुंकले आहे. या विषयासाठी मंगळवारी मनसेचे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिडको सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आणि रोजगार विभाग उपायुक्त सचिन जाधव यांची भेट घेतली. सिडकोकडून माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार सदर विमानतळ प्रकल्पात स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भात सिडकोने कोणतेही धोरण आखले नाही. तसेच आतापर्यंत या प्रकल्पात किती स्थानिक मराठी भाषिकांना समाविष्ट केले, याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितलं. यावेळी शांतनू गोयल यांनी भूमिपुत्रांसाठी कौशल्य रोजगार विभागासोबत मिळून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच स्थानिकांना जास्तीत जास्त नोकरीत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मनसेला दिले.


या सोबत मनसे शिष्टमंडळाने कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता विभागाचे उपायुक्त सचिन जाधव यांची भेट घेतली. रोजगार विभाग यांच्या अनास्थेमुळे मराठी तरुणांना विमानतळ प्रकल्पात नोकरी मिळत नसल्या बाबत नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या काही दिवसांत याबाबत कौशल्य, रोजगार विभागाने कार्यवाही नाही केली तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला. मनसेच्या शिष्टमंडळात मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे, पनवेल शहरअध्यक्ष योगेश चिले, नवी मुंबई मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, अभिजीत देसाई, मनसे रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, मनपा शहरअध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे, महिला सेना शहरअध्यक्ष आरती धुमाळ, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे आणि विभागअध्यक्ष भूषण कोळी, अमोल आयवळे, अक्षय भोसले उपस्थित होते.

Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

...तर गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द होणार?

नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली जाण्याची शक्यता मुंबई :  गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या