दिव्यातील जळालेली वात फेकणे शुभ की अशुभ? जाणून घ्या सविस्तर....

मुंबई : घरात देवपूजा करताना किंवा दिवा लावताना वापरल्या जाणाऱ्या वाती अनेकजण सहजपणे कचऱ्यात फेकून देतात. मात्र, धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार हे करणं अशुभ मानले जाते. दिवा हे केवळ प्रकाशाचं नाही, तर शुभ, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. दिव्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे जळलेल्या वातींचे महत्त्व वाढते, असं वेदांमध्ये सांगितलं आहे.


अध्यात्मिक मान्यतांनुसार, दिवा विझल्यानंतर वातींमध्ये सकारात्मक ऊर्जा जमा झालेली असते. त्यामुळे त्या वाती कचऱ्याच्या डब्यात टाकल्यास, त्यांच्यासोबत घरातील सकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते, असं मानलं जातं. त्यामुळे, नकळत होणारी ही चूक टाळायला हवी.



वाती योग्यरित्या कशा हाताळाव्यात?


वाती काळजीपूर्वक गोळा करून एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवाव्यात. गोळा केलेल्या वाती पौर्णिमा, अमावस्या, पूर्व काळ, अष्टमी किंवा नवमी यांसारख्या विशिष्ट दिवशी एका ठिकाणी ठेवा. त्यावर थोडा कापूर ठेवा. शक्य असल्यास, वातींवर तुपाचे दोन थेंब ओता. हे मिश्रण पुन्हा प्रज्वलित करा. या प्रक्रियेतून जी विभूती तयार होते, ती अत्यंत सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण मानली जाते.



विभूतीचे फायदे काय?


ही शुभ विभूती अनेक चांगल्या कार्यांसाठी वापरली जाऊ शकते. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.


तुम्ही कपाळावर टिळा म्हणून लावल्यास, मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते.


कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी किंवा शुभ कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ही विभूती लावल्यास ते शुभफळ देते.


ही विभूती घराच्या मुख्य दाराजवळ ठेवल्यास घराची कीर्ती, वैभव आणि प्रतिष्ठा वाढते.


घरात असलेली काळी जादू किंवा नकारात्मक शक्ती या विभूतीच्या वापराने दूर होतात, असे मानले जाते.


ही विभूती घरमालकाचे आरोग्य आणि दीर्घायुष्य सुधारण्यास मदत करते, अशी श्रद्धा आहे.


त्यामुळे दिव्याच्या वाती केवळ कचरा नसून, त्या सकारात्मक ऊर्जेचं भांडार आहेत. त्यांना योग्य मान देऊन विधी केल्यास, घरातील सुख-समृद्धी कायम राहते.

Comments
Add Comment

Yeola : नगर-मनमाड महामार्गावर पेट्रोल-डिझेलचा टँकर उलटला; गोपाळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात

येवला : नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad highway) येवला तालुक्यातील गोपाळवाडी फाट्याजवळ आज मंगळवार दि ५ रोजी दुपारी दीड

Former IPS officer Meera Borwankar : 'त्या' निव्वळ अफवा, मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीवर सरकारचं स्पष्टीकरण

Maharashtra State Commission for Women : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

IPL 2026 : जसप्रीत बुमराहवर दिग्गज खेळाडू संतापला आणि म्हणाला..

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये काल (४ मे सोमवार) मुंबई विरुद्ध लखनऊचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने लखनऊचा सहा विकेट्स

'Raja Shivaji' : ‘तासनतास श्वास रोखून…’ अफजलखानाच्या ६३ बेगमच्या हत्येचा थरारक सीन; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

मुंबई : ‘राजा शिवाजी’ या सिनेमातील अफजलखानाच्या बेगमच्या हत्येचा तो थरारक सीन प्रेक्षकांना अक्षरशः स्तब्ध करून

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये मोठा बदल! नव्या ट्रेनची यूपीमध्ये चाचणी

उत्तर प्रदेश : मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेनच्या संदर्भात महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. स्वयंचलित

Raghu Sharma Celebration : गोलंदाज रघु शर्माची चिठ्ठी व्हायरल, सूर्यकुमारसह सर्वांनी वाचली चिठ्ठी

मुंबई : आयपीएल २०२६ च्या ४७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा सहा विकेट राखून पराभव केला. या