Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू


२४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान


२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी


मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. २ डिसेंबर रोजी मतदान होईल, तर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.


राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते.


वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबर पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबरपर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.


निवडणूक होत असलेल्यांपैकी १० नवनिर्मित नगरपरिषदा आहेत. उर्वरित सर्व २३६ नगरपरिषदांची मुदत संपली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे पातूर (जि. अकोला) नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याचबरोबर एकूण १४७ पैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी १५ नवनिर्मित तर उर्वरित सर्व २७ नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. १०५ नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्याही प्रतिनिधींशीही संवाद साधण्यात आला आहे. असेही वाघमारे यांनी सांगितले.


उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल आणि उमेदवारांना २५ नोव्हेंबरपर्यंत आपली नावे मागे घेता येतील. मतदार यादी तयार करण्यासाठी १ जुलै ही कट-ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये सध्या सुमारे १.०३ कोटी पात्र मतदारांचा समावेश आहे.


राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सचिव सुरेश काकानी यांच्यासह घोषणा करताना स्पष्ट केले की, मतदान ईव्हीएम वापरून केले जाईल, परंतु व्हीव्हीपीएटी प्रणाली वापरली जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सध्याच्या कायद्यांमध्ये व्हीव्हीपीएटीला परवानगी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या २४६ नगर परिषदांपैकी १० तर ४२ नगर पंचायतींपैकी १५ नव्याने स्थापन झालेल्या आहेत, असेही वाघमारे यांनी सांगितले.





  • सुमारे १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.




  • या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिटचा वापर केला जाईल.




  • एका नगर पंचायतीमध्ये एका प्रभागात २ जागा आहेत. उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन स्वीकारले जातील.




  • उमेदवार जास्तीत जास्त ४ प्रभागात अर्ज दाखल करू शकतो.




  • उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर एखाद्याने जात वैधतेसाठी अर्ज केला असेल तर पावती आवश्यक असेल.




  • ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदार ओळखण्यासाठी विशेष स्टार व्यवस्था




  • मतदान केल्यास तितके स्टार दिसून येतील अधिक स्टार दिसल्यास त्यांना दुसऱ्या मतदान केंद्रावर मत देता येणार नाही




  • मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा, दिव्यांग, गरोदर, तान्ह्या बाळांना घेऊन येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठांसाठी विशेष व्यवस्था




  • वीज, पाणी, सावली आणि शौचालयाची व्यवस्था




  • काही मतदान केंद्र गुलाबी असतील यात सर्व प्रकारचा स्टाफ महिलाच असेल




  • इमारतींमध्ये मोबाईल नेता येईल. पण मतदानाच्या ठिकाणी मोबाईल नेता येणार नाही




  • प्रत्येक उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक




  • मतदारांसाठी जे संकेतस्थळ दिलं आहे, त्यात सर्च फॅसिलिटी असून तिथे मतदारांना नाव आणि केंद्र शोधता येईल.




  • मोबाईल अॅपद्वारे नाव आणि केंद्र शोधण्याची व्यवस्था असून यात उमेदवाराविषयी माहितीही उपलब्ध असणार आहे.




  • ६८५९ सदस्य आणि २४८ अध्यक्ष निवड होणार




  • राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज स्वीकारण्यात येणार




  • त्याची प्रिंट आउट काढून निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी लागेल




  • ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार




  • १ कोटी ७ लाख मतदार, १३,३५५ मतदान केंद्र




  • ईव्हीएमवरच निवडणूक होणार




निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगरपरिषदा व नगरपंचातीच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आजच (ता. ४ नोव्हेंबर २०२५) दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.


नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती करण्याचे आदेश संबंधित सर्व जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांबरोबरच नवीन माध्यमांचा कौशल्यपूर्ण वापर करण्याबाबत आयोगाने १२ जून २०२५ रोजी पत्राद्वारे सर्वांना निर्देश दिले आहेत. मतदार जागृतीसंदर्भातील सर्व सूचना व निर्देश मार्गदर्शक स्वरुपात असून, स्थानिक पातळीवर काही नावीन्यपूर्ण उपक्रम सूचल्यास तेही आपापल्या स्तरावर राबविण्याबाबत कळविले आहे.



जिल्हानिहाय नगरपरिषदा व नगरपंचायती (न.पं.)


पालघर- डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा (न.पं).


रायगड अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड- जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण (न.प.).


रत्नागिरी- चिपळूण, देवरुख (न.पं.). गुहागर, खेड, लांजा (न.पं.), राजापूर आणि रत्नागिरी,


सिंधुदूर्ग- कणकवली (न.पं.), मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला.


ठाणे- अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर.


अहिल्यानगर- देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.) (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहूरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर,


धुळे- दोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा (न.पं.) आणि शिरपूर वरवाडे, जळगाव जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर (न.पं.), नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी (न.पं.), बरणगाव आणि यावल, नंदूरबार शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा.


नाशिक- भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपूरी, ओझर, पिंपळगांव बसवंत आणि त्र्यंबक.


कोल्हापूर- आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव.


पुणे- आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी- उरळी देवाची, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु. (न.पं.), मंचर (न.पं.), राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव- दाभाडे आणि वडगाव (न.पं.). सांगली आष्टा, आटपाडी (न.पं.), इस्लामपूर, जत. पळूस, शिराळा (न.पं.), तासगाव आणि विटा. सातारा- कराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा (न.पं.), म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा आणि वाई.


सोलापूर- अक्कलकोट, अकलूज, अनागर (न.पं.), बार्शी, दुधनी, करमाळा, कुडूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला.


बीड- अंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई. माजलगाव आणि परळी- वैजनाथ, छत्रपती संभाजीनगर- फूलब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर, धाराशिव भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर आणि उमरगा,


हिंगोली- बसमतनगर, हिंगोली आणि कळमनुरी. जालना अंबड, भोकरदन आणि परतूर. लातूर- अहमदपूर, औसा, निलंगा, रेनापूर (न.पं.) आणि उदगीर.


नांदेड- बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट आणि लोहा,


परभणी- गंगाखेड, जिंतूर, मानवत. पाथरी, पूर्णा, सेलू आणि सोनपेठ. अकोला अकोट, बाळापूर, बार्शी- टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर आणि तेल्हारा.


अमरावती - अचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पं.), मोर्शी, नांदगाव खंडेश्वर (न.पं.), शेंदूरजनाघाट आणि वरुड.


बुलढाणा- बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव आणि सिंदखेडराजा, वाशीम-कारंजा, मालेगाव (न.पं.), मंगरुळपीर, रिसोड आणि वशीम, यवतमाळ आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (न.पं.), नेर- नबाबपूर आणि पांढरकवडा.


भंडारा- पवनी, साकोली शेंदूरवाफा, तुमसर आणि भंडारा. चंद्रपूर- बल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.), ब्रहापूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा आणि वरोरा,


गडचिरोली- आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली. गोंदिया गोंदिया, गोरेगाव (न.पं.), सालेकसा (न.पं.) आणि तिरोडा.


नागपूर- बहादुरा (न.पं.), बेसा पिपळा (न.पं.), भिवापूर (न.पं.). बुटिबोरी, डिगडोह, कळमेश्वर-ब्रह्मणी, कामठी, कांद्री कन्हान (न.पं.), काटोल, खापा, कोंढाळी (न.पं.), महादुला (न.पं.), मोहपा, मौदा (न.पं.), नरखेड, निलडोह (न.पं.), पारशिवणी (न.पं.), रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, विडगाव- तरोडी (खु) पांढुर्णा (न.पं.), गोधणी रेल्वे (न.पं.), कन्हान- पिपरी, मोवाड, वाडी आणि येरखेडा (न.पं.). वर्धा- आर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे आणि वर्धा.



एकूण मतदार व मतदान केंद्र


पुरुष मतदार- ५३.७९.९३१
महिला मतदार- ५३.२२.८७०
इतर मतदार- ७७५
एकूण मतदार- १,०७,०३,५७६
एकूण मतदान केंद्र- सुमारे १३.३५५



एकूण जागा आणि आरक्षित जागा


निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा- २४६
निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- ४२
एकूण प्रभाग- ३,८२०
एकूण जागा-६,८५९
महिलांसाठी जागा- ३.४९२
अनुसूचित जातींसाठी जागा- ८९५
अनुसूचित जमातीसाठी जागा-३३८
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- १.८२१



नगरपरिषद / नगरपंचायतींची जिल्हा व विभागनिहाय संख्या


पालघर- ४
रायगड- १०
रत्नागिरी- ७
सिंधुदुर्ग- ४
ठाणे-२
कोकण विभाग एकूण- २७


अहिल्यानगर- १२
जळगाव- १८
धुळे- ४
नंदूरबार- ४
नाशिक- ११
नाशिक विभाग एकूण - ४९


कोल्हापूर- १३
पुणे-१७
सांगली- ८
सातारा- १०
सोलापूर- १२
पुणे विभाग एकूण - ६०


छत्रपती संभाजीनगर- ७
बीड - ६
धाराशिव- ८
हिंगोली- ३
जालना- ३
लातूर- ५
नांदेड-१३
परभणी- ७
छत्रपती संभाजीनगर एकूण ५२


अमरावती- १२
अकोला- ६
बुलढाणा- ११
वाशीम-५
यवतमाळ- ११
अमरावती विभाग एकूण ४५


भंडारा- ४
चंद्रपूर-११
गडचिरोली- ३
गोंदिया- ४
नागपुर- २७
वर्धा- ६
नागपूर  विभाग  एकूण  ५५



मतदान केंद्रावरील सुविधा


मतदान केंद्रावर दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आदींना प्राधान्याने मतदान करून दिले जाईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलबद्ध करून दिली जाईल. संबंधित ठिकाणी कृष्ठरोग्यांसाठी वेगळे वसतिगृह / आश्रम असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यास हरकत नसेल. तिथे उपलब्धतेनुसार डॉक्टरांची नेमणूक केली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकचे असेल; परंतु शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र 'पिंक मतदान केंद्र' म्हणून ओळखले जाईल. मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये; परंतु मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाईल दूरध्वनी जमा करण्यासाठी शक्य तिथे कक्ष असेल.

Comments
Add Comment

लाडकी बहीण योजना कायम राहणार; नगरपालिकांवर भगवा फडकवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

अकोला : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात दिसणाऱ्या बिबट्यांची

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३