२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका


मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या तेरा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कफील अहमद मोहम्मद अयुब (६५) याला मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) जामीन मंजूर केला. या जीवघेण्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १२७ जण जखमी झाले होते.


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरआर भोसले यांच्या खंडपीठाने १ लाख रुपयांच्या जामिनावर अयुबला जामीन दिला आहे. या प्रकरणातील कोर्टाच्या संपूर्ण आदेशाची प्रत अद्याप जाहीर झालेली नाही. मूळचा बिहारचा असलेला अयुब फेब्रुवारी २०१२ पासून मुंबई सेंट्रल तुरुंगात सतत कोठडीत आहे.


२०११ मध्ये, झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर काबुतरखाना या तीन ठिकाणी अवघ्या १० मिनिटांच्या अंतराने स्फोट झाले होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हे हल्ले घडवून आणल्याचा आरोप केला होता.


अयुबचे वकील मुबीन सोळकर यांनी युक्तिवाद केला की, खटला अतिशय संथ गतीने चालत असताना त्यांचा पक्षकार एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात आहे. अभियोग पक्षाने ८०० साक्षीदारांची तपासणी करण्याचे सांगितले होते, पण आतापर्यंत केवळ १७० हून अधिक साक्षीदारांचीच साक्ष झाली आहे. अयुबने आपल्यावरील आरोपांना खोटे ठरवत आणि अटकेपूर्वी दिलेला कबुलीजबाब ऐच्छिक नव्हता, असा दावा करत जामिनाची मागणी केली होती.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी