२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका


मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या तेरा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कफील अहमद मोहम्मद अयुब (६५) याला मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) जामीन मंजूर केला. या जीवघेण्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १२७ जण जखमी झाले होते.


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरआर भोसले यांच्या खंडपीठाने १ लाख रुपयांच्या जामिनावर अयुबला जामीन दिला आहे. या प्रकरणातील कोर्टाच्या संपूर्ण आदेशाची प्रत अद्याप जाहीर झालेली नाही. मूळचा बिहारचा असलेला अयुब फेब्रुवारी २०१२ पासून मुंबई सेंट्रल तुरुंगात सतत कोठडीत आहे.


२०११ मध्ये, झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर काबुतरखाना या तीन ठिकाणी अवघ्या १० मिनिटांच्या अंतराने स्फोट झाले होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हे हल्ले घडवून आणल्याचा आरोप केला होता.


अयुबचे वकील मुबीन सोळकर यांनी युक्तिवाद केला की, खटला अतिशय संथ गतीने चालत असताना त्यांचा पक्षकार एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात आहे. अभियोग पक्षाने ८०० साक्षीदारांची तपासणी करण्याचे सांगितले होते, पण आतापर्यंत केवळ १७० हून अधिक साक्षीदारांचीच साक्ष झाली आहे. अयुबने आपल्यावरील आरोपांना खोटे ठरवत आणि अटकेपूर्वी दिलेला कबुलीजबाब ऐच्छिक नव्हता, असा दावा करत जामिनाची मागणी केली होती.

Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी