विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच


नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. परंतु, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे महसूल चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात दिले.


नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन हे नागपूर येथे होत असते. विशेषतःहिवाळी अधिवेशनच नागपुरात घेण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पालिकांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घ्यायच्या आहेत. एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे तीन टप्प्यात या निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्या दृष्टिकोनातून आयोगाची तयारी सुरू आहे. या निवडणुकांसाठी अधिवेशनाची तारखेत बदल होण्याची चर्चा होती. हे अधिवेशन आठ, दहा दिवस लवकर होईल, अशीही चर्चा होती. परंतु, अद्याप प्रशासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारच्या सूचना नाहीत. निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता अधिवेशन ठरल्याप्रमाणे ८ डिसेंबरला सुरू न होता एक आठवडा पुढे ढकलले जाण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

Comments
Add Comment

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला