विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच


नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. परंतु, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे महसूल चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात दिले.


नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन हे नागपूर येथे होत असते. विशेषतःहिवाळी अधिवेशनच नागपुरात घेण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पालिकांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घ्यायच्या आहेत. एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे तीन टप्प्यात या निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्या दृष्टिकोनातून आयोगाची तयारी सुरू आहे. या निवडणुकांसाठी अधिवेशनाची तारखेत बदल होण्याची चर्चा होती. हे अधिवेशन आठ, दहा दिवस लवकर होईल, अशीही चर्चा होती. परंतु, अद्याप प्रशासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारच्या सूचना नाहीत. निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता अधिवेशन ठरल्याप्रमाणे ८ डिसेंबरला सुरू न होता एक आठवडा पुढे ढकलले जाण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

Comments
Add Comment

Satyajeet Tambe : सत्यजित तांबे अखेर भाजपच्या उंबरठ्यावर? मामा बाळासाहेब थोरातांनीच दिले 'ग्रीन सिग्नल'; म्हणाले, 'तो सज्ञान...

अहिल्यानगर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष

धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; जनता महायुतीसोबत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांना चपराक पंढरपूर :“आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मो o-.र्चे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

काय सांगता ? २८० किलोच्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची इतक्या लाखांना विक्री

छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय