Telangana Bus Accident : थरकाप उडवणारा अपघात! हायस्पीड लॉरी थेट बसमध्ये घुसली; किंचाळ्या आणि रक्ताचा सडा; २० हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत!

तेलंगणा : तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल (Chevella Mandal) येथे झालेल्या एका भीषण बस अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढून २० वर पोहोचली आहे. हा भीषण अपघात हैदराबाद-विजापूर महामार्गावर (Hyderabad-Vijaypur Highway) चेवेल्ला मंडळातील मिर्झागुडा (Mirzaguda) जवळ घडला. तंदूर डेपोची आरटीसी बस आणि गिट्टीने भरलेला टिप्पर ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, टिप्पर ट्रकमध्ये भरलेली खडी बसच्या आत कोसळली. यामुळे बसमधील अनेक प्रवासी चिरडले गेले. या भीषण दुर्घटनेत टिप्पर चालकाचाही जागीच मृत्यू झाला, तर डझनभर प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ७० हून अधिक प्रवासी होते. यातील २० जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



जखमींवर चेवेल्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू




तेलंगणामधील चेवेल्ला मंडल येथे टिप्पर आणि आरटीसी बसच्या जबर धडकेनंतर अपघातग्रस्त बसमध्ये मोठा गोंधळ उडाला. अपघातानंतर बसमध्ये आरडा-ओरडा, किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले आणि अफरातफरी माजली. अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अनेक प्रवासी चिरडले गेले होते, तर जखमींच्या किंचाळ्या, रक्ताने भरलेली सीट असे हृदयद्रावक दृश्य घटनास्थळी दिसत होते. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले. बसमधील जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य जलद गतीने पूर्ण करावे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.



जखमींवर हैदराबादमध्ये उपचार करा; मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश


अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तात्काळ हैदराबादमधील (Hyderabad) रुग्णालयात हलवावे, अशा सूचना त्यांनी तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांना दिल्या आहेत. जखमींच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता नसावी आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, याची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्येक स्तरावरील परिस्थितीची माहिती देण्याचे आणि अपघाताबाबत सतत अपडेट्स देण्याचीही सूचना दिली आहे. तसेच, घटनास्थळाजवळील मंत्र्यांनी तातडीने तेथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेण्याचे आणि प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या संकटाच्या काळात प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल, अशी ग्वाही दिली आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Jodhpur Accident : धक्कादायक! ट्रेलरला धडकलेल्या बसमध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी अंत, जोधपूर हादरले!

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी रस्ता अपघात घडला आहे. हा अपघात फलोदी

केवळ लग्नास नकार देणे भारतीय न्याय संिहतेनुसार अात्महत्येस चिथावणी ठरत नाही: सर्वोच्च न्यायालय

पुरुषाविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा खटला रद्द नवी दिल्ली : "एका तरुणीने आपले जीवन संपवण्याचे टोकाचे

पाकिस्तानची अन्न-पाणी सुरक्षा संकटात

सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याचा परिणाम; सिडनीतील संस्थेचा अहवाल नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी

नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह

श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे