मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. स्थानकात नव्या पादचारी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं असून, या पुलामुळे आता प्रवाशांना रूळ ओलांडण्याची वेळ येणार नाही. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एमयूटीपी प्रकल्पांतर्गत हा पूल उभारला आहे. या पुलामुळे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागासह सर्व प्लॅटफॉर्म एकमेकांशी जोडले जाणार आहेत. गर्दीच्या वेळेतही प्रवाशांची वर्दळ आता अधिक सुकर होईल. या नव्या पुलामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.


पुलाची वैशिष्ट्ये:


लांबी: ६६ मीटर
रुंदी: ६ मीटर
बांधकाम खर्च: सुमारे ६ कोटी रुपये
जोडणी: प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ तसेच पूर्वेकडील भाग
पायऱ्या: प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अडीच ते तीन मीटर रुंदीच्या पायऱ्या


या पुलाला स्टेशनच्या पूर्वेकडील ५ मीटर रुंदीच्या स्कायवॉकचीही जोडणी मिळणार आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील ९.५ मीटर रुंदीच्या डेक्सलाही हा पूल जोडणार आहे. यामुळे सर्व प्लॅटफॉर्म, पूल आणि स्टेशन डेक यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होईल.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड