हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला असतानाच, कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या विनम्रतेने आणि संस्कारांनी सर्वांचं मन जिंकलं.


विजयानंतर हरमनप्रीतने सर्वप्रथम आपल्या कोच अमोल मुजूमदार यांची भेट घेतली आणि त्यांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतला. मैदानावर घडलेला हा प्रसंग पाहून सर्वजण भारावून गेले. विजयानंतरही आपल्या गुरूंचा आदर राखणाऱ्या हरमनप्रीतच्या या कृतीने भारतीय संस्कारांचं दर्शन घडलं.


यानंतर विश्वचषक स्वीकारण्यासाठी ती व्यासपीठावर गेली असता, बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर तिने त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. मात्र जय शाह यांनी तिला थांबवत “नको” असा इशारा दिला. या काही क्षणांच्या दृश्याने संपूर्ण स्टेडियममध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं आणि सोशल मीडियावरही हरमनप्रीतच्या या कृतीवर कौतुकाचा वर्षाव झाला.


थोड्याच वेळात हे भावनिक वातावरण जल्लोषात बदललं. हरमनप्रीतने ट्रॉफी उचलताच सहकाऱ्यांसोबत मैदानात भांगड्याचा जल्लोष सुरु झाला. फटाक्यांचा आवाज, आनंदाश्रू आणि अभिमानाची भावना, प्रत्येक क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला.


या विजयाने भारताच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. भारताने ७ गडी गमावून २९८ धावा केल्या. शेफाली वर्माच्या दमदार ८७ धावा आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळी (५५ धावा, ५ बळी) यांनी विजयाची पायाभरणी केली. दक्षिण आफ्रिकेच्या Laura Wolvaardt हिने शतक झळकवलं, मात्र तिच्या या झुंजार खेळीनेही भारताचा विजय रोखू शकला नाही.

Comments
Add Comment

International Drug Racket Busted : ‘ऑपरेशन क्लीन मुंबई’! १७४५ कोटींचं कोकेन जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईत धडक कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे गेले संपूर्ण कुटुंबाचे प्राण; फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबई हादरली होती. सुरुवातीला कलिंगड

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ