Jodhpur Accident : धक्कादायक! ट्रेलरला धडकलेल्या बसमध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी अंत, जोधपूर हादरले!

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी रस्ता अपघात घडला आहे. हा अपघात फलोदी तालुक्यात झाला, जिथे एका टेम्पो ट्रॅव्हलरने (Tempo Traveller) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो ट्रॅव्हलरचे अक्षरशः तुकडे झाले. या अपघातामुळे टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रेलर पाहिला नाही, आणि याच मानवी चुकीमुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत व बचावकार्य (Rescue Work) सुरू करण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य (Rescue Operation) अजूनही सुरू आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.



१८ जणांचा बळी, मृतांमध्ये महिला-लहान मुलांचाही समावेश!




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांची ही टेम्पो ट्रॅव्हलर बस जोधपूरच्या सूरसागर भागातून बीकानेर जिल्ह्यातील कोलायत तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन परत येत असताना, मतोडाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रेलरला बसची जोरदार धडक बसली. मतोडा पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले की, बस भरधाव वेगात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३ ते ४ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि रुग्णवाहिका टीम तातडीने दाखल झाल्या आणि त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. गॅस कटरच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. जखमी भाविकांना प्राथमिक उपचार देऊन जोधपूरमधील एसएमएस आणि एमडीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी फलोदी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.



स्थानिक नागरिकांची प्रशासनाकडे संतप्त मागणी


अपघाताची गंभीरता लक्षात घेता, प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासनाकडे कठोर मागणी केली आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या अवजड वाहनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी असलेली वाहने अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असल्यामुळे ही कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून

Independence Day 2026 : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी फडकवणार तिरंगा; स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली हाय अलर्टवर, वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी