Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या वाढलेल्या वर्दळीसोबतच या मार्गावरच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोस्टल रोडवर अनेक ठिकाणी अनियंत्रित वेगमर्यादेमुळे अपघाताची काही प्रकरणे घडली आहेत. या गंभीर परिस्थितीत, वरळी (Worli) ते वांद्रे सी लिंक (Bandra Sea Link) दरम्यान असलेल्या मार्गावरील खांबांवरील पथदिवे वारंवार बंद राहत आहेत. यामुळे वाहनचालकांना संपूर्ण अंधारातून प्रवास करावा लागत आहे. पथदिवे बंद असल्याने आणि वेगमर्यादेवर नियंत्रण नसल्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मार्गावरील दिवे सुरू करण्याची आणि वेगमर्यादेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची मागणी नागरिक करत आहेत.



कोस्टल रोडवर वेगाचे उल्लंघन आणि अंधार; मुंबईकरांचा संताप


दरम्यान कोस्टल रोडवरील दिवे बंद असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. एका प्रवाशाने सोशल मीडियावरुन या गंभीर समस्येबाबत तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईकरांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. कोस्टल रोडच्या उभारणीसाठी तब्बल १४ हजार कोटी रुपये (₹14,000 Crore) खर्च करूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर विजेच्या खांबांसाठी मुंबईकरांनी आपल्या खिशातून पैसे द्यायचे का? असा संतप्त सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे. कोस्टल रोड सुरू झाल्यापासून सप्टेंबरपर्यंत आठ हजारांहून अधिक वाहनांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. विशेषतः, बोगद्यात वाहनांचा वेग ताशी १४१ ते १४७ किमीपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. भरधाव वेग आणि कोस्टलवरील वळणांच्या मार्गावर असलेला अंधार, यामुळे भविष्यात अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने दिव्यांची समस्या सोडवावी आणि वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी जोर धरत आहे.



कोस्टल रोडवरील भुयारी मार्गातही अंधार! नागरिकांना मोबाईलचा आधार


मुंबईकरांना समुद्राचे सौंदर्य जवळून न्याहाळता यावे म्हणून महानगरपालिकेने (BMC) कोस्टल रोडवर प्रोमेनाड खुला करून दिला आहे. मात्र, कोस्टल रोडप्रमाणेच, त्यावर जाण्यासाठी बांधलेल्या पादचारी भुयारी मार्गातही अंधार असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. भुयारी मार्गातून प्रवास करताना नागरिकांना मोबाईलच्या लाईटचा वापर करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ऑक्टोबर महिन्यात कोस्टल रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन करत एक कार संरक्षक कठडा तोडून थेट समुद्रात कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत रोडच्या लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीबद्दल पालिकेने संबंधित तरुणाला दोन लाख ६५ हजार रुपये नुकसानभरपाई भरण्यासाठी पत्र पाठवले आहे. कोस्टल रोडवर दिवे बंद असणे आणि पादचारी मार्गातही अंधार असणे, ही बाब १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर मोठी टीका करणारी आहे.

Comments
Add Comment

बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात