बाजारात अजूनही दोन हजार रूपयांच्या नोटा, RBI ने दिली धक्कादायक माहिती



नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा २०००च्या नोटा चर्चेचा विषय ठरत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकताच अहवाल जारी करत मोठा खुलासा केला आहे की, नोटबंदी-सदृश निर्णयाला दीड वर्ष उलटले असतानाही अजूनही तब्बल ५८१७ कोटी मूल्याच्या २०००च्या नोटा बाजारातून परत आल्या नाहीत.बहुतेक लोकांना वाटत होते की या नोटा पूर्णपणे चलनातून गायब झाल्या आहेत, मात्र आरबीआयच्या आकडेवारीने चित्र वेगळे दाखवले आहे.

रिझर्व्ह बँकेने शनिवारी जाहीर केलेल्या निवेदनात सांगितले की, १९ मे २०२३ रोजी दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर झाला तेव्हा या नोटांची एकूण किंमत ३.५६ लाख कोटी रुपयांची होती. आता ती केवळ ५८१७ कोटी रुपये इतकीच उरली आहे. म्हणजेच आरबीआयच्या मते ९८.३७ टक्के या नोटा परत बँकिंग व्यवस्थेत जमा झाल्या आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की दोन हजारच्या नोटा अजूनही कायदेशीर चलन आहेत आणि व्यवहारात स्वीकारल्या जाऊ शकतात. मात्र या नोटांची छपाई बंद करण्यात आली असून बँका त्या पुन्हा जारी करणार नाहीत.

१९ मे २०२३ पासून आरबीआयच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये या नोटा जमा किंवा बदलण्याची सोय करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर २०२३ पासून सामान्य जनतेसाठी ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे. लोक आता इंडिया पोस्ट मार्फत देखील दोन हजार रूपयाच्या नोटा कोणत्याही आरबीआय कार्यालयात पाठवून आपल्या बँक खात्यात रक्कम जमा करू शकतात.

ही कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत. आरबीआयने सांगितले की दोन हजारच्या नोटांच्या परतीच्या स्थितीबाबत तो वेळोवेळी अद्ययावत माहिती देत राहील.

आर्थिक तज्ञांच्या मते काही नोटा अजूनही ग्रामीण भागात किंवा रोख व्यवहारांवर आधारित व्यवसायांमध्ये अडकल्या असण्याची शक्यता आहे, तर काही लोकांनी या नोटा स्मृतीचिन्ह किंवा कलेक्शन म्हणून जपून ठेवल्या आहेत.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी