११ कोटींची लॉटरी जिंकली, पण विजेता गायब !

पंजाब : पंजाब सरकारने काढलेल्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये बठिंडा येथील एका व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलले आहे. या तिकीटधारकाने तब्बल ११ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जिंकले आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट अशी की, एवढा मोठा जॅकपॉट लागूनही हा विजेता अजूनपर्यंत आपले बक्षीस घेण्यासाठी पुढे आलेला नाही. त्यामुळे लॉटरी एजन्सीने या भाग्यवान विजेत्याचा शोध सुरू केला आहे. हे तिकीट 'रत्न लॉटरी' एजन्सीतून विकत घेण्यात आले होते.


बठिंडा येथील रत्न लॉटरी एजन्सीचे संचालक उमेश कुमार यांनी सांगितले की, “मी विजेत्याचा शोध घेत आहे.” त्यांच्या एजन्सीमार्फत विकल्या गेलेल्या एका तिकिटावर हे मोठे बक्षीस लागले आहे. "निकाल जाहीर झाल्यावर आणि आमच्या एजन्सीच्या तिकीटाने ११ कोटी जिंकल्याचे कळताच, आम्हाला खूप आनंद झाला आहे. हे तिकीट कोणी घेतले, हे जाणून घेण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत."


उमेश कुमार यांनी सांगितले की, सामान्यतः बक्षीस लागताच विजेते लगेच संपर्क साधून पुढील औपचारिकता पूर्ण करतात, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. विजेत्याने आमच्याशी किंवा कंपनीशी अजून संपर्क साधलेला नाही. हा विजेता लवकरच समोर येईल आणि आपल्या आनंद सर्वांसोबत शेअर करेल, अशी आशा एजन्सीने व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'जर तिकीटधारकाने वेळेत येऊन बक्षिसावर दावा केला नाही, तर नशिबाने दिलेली ही सुवर्णसंधी त्याच्या हातून निसटू शकते.

Comments
Add Comment

५५ देशांच्या युद्धनौकांचे भारताच्या समुद्रात शक्तीप्रदर्शन होणार; पाच दिवसांचा संयुक्त अभ्यास, शस्त्र पाहणी

नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान, अमेरिका-भारत, अमेरिका-रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण,

ट्रेन तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल; आता याच लोकांना मिळणार लोअर बर्थ

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन तिकीट बुकींगच्या प्रक्रीयेला अधिक सोपी आणि पारदर्शक

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' चा वर्ल्ड रेकॉर्ड!

पंतप्रधान मोदींकडून महिला-केंद्रित आरोग्य अभियानाचे कौतुक नवी दिल्ली: 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' (Swasth Nari,

सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी

दिल्ली नाही इंद्रप्रस्थ म्हणा, भाजप खासदाराची मागणी, अमित शाहंना पाठवलं पत्र

नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलल्यानंतर 'आता थेट राजधानी दिल्लीचं नाव बदलण्याची

Venkateshwara Swami Temple : हादरवणारी दुर्घटना! व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भाविकांचा मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम (Srikakulam) जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. येथील व्यंकटेश्वर