सिक्कीममध्ये हिमवृष्टी! झारखंड आणि उत्तर बंगालमध्ये अतीवृष्टी होण्याची शक्यता, खराब वातावरणामुळे अर्थमंत्र्यांनी रद्द केला भूतान दौरा

सिक्कीम: भारत-चीन सीमेवर झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे सिक्कीममधील तापमानात मोठी घट झाली आहे. हिमवृष्टीमुळे अनेक भागात पारा शून्याखाली गेला आहे. ज्याचा परिणाम सिक्कीममधील जनजीवनावर झाला असून हवामान खात्याने पुढील २४ तासांत सिक्कीममधील हवामान आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी सिक्कीममध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सिक्कीममध्ये जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टमध्ये पर्यटकांना उंचावरील भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर सीमा रस्ते संघटनेचे पथक बर्फ हटवण्यासाठी सतत काम करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा हवामान बदलाचा परिणाम असू शकतो. कारण, अशी हिमवृष्टी सहसा नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होते.


हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, तवांग, पश्चिम कामेंग, लोअर सुबानसिरी आणि अंजाव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोअर दिबांग व्हॅलीच्या काही भागातही वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.




झारखंडमध्ये सुद्धा पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने १३ जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. तर उत्तर बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . चक्रीवादळ मोंथाच्या प्रभावामुळे, पुढील २४ तासांत उत्तर बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की अलीपूरद्वार, कूचबिहार, जलपाईगुडी, कालिम्पोंग आणि दार्जिलिंग जिल्ह्यांमध्ये वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.


खराब हवामानामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा भूतानचा अधिकृत दौरा रद्द करण्यात आला आहे. सीतारमण ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भारत आणि भूतानमधील आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने भूतानला भेट देणार होत्या. या चार दिवसांच्या दौऱ्यात त्या आर्थिक व्यवहार विभागाच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार होत्या.

Comments
Add Comment

'पाकिस्तानचा देशव्यापी घातपाताचा कट उधळला; दिल्ली स्फोटावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई : २६/११ दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना आणि शहीद

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा