Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. एका तरुणावर तलवारीसारख्या धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवून कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय आहे आणि आरोपींनी ही हत्या कोणत्या उद्देशाने केली, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



३० सेकंदांत हल्लेखोरांनी गळा चिरला


शहाबाजार परिसरात निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव समीर खान इनात खान उर्फ मालेगाव (Sameer Khan Inayat Khan alias Malegaon) असून त्याचे वय ३० वर्षे होते आणि तो चेलीपुरा येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अवघ्या ३० सेकंदांत हा प्राणघातक हल्ला केला आणि धारदार शस्त्राने समीर खान यांचा गळा चिरला. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या पूर्ववैमनस्यातून आणि सूडबुद्धीने झाल्याचा संशय आहे. या संशयाला बळकटी देणारे कारण म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच समीर खान यांच्यावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस आता या हत्येचा आणि मागील गुन्ह्याचा संबंध तपासत आहेत.




'निशान दर्गा' परिसरात दिवसाढवळ्या थरार


शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कबड्डीपटू समीर खान यांची हत्या नेमकी कशी झाली, याचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे. समीर खान निशान दर्गा परिसरात उभा असताना, चार आरोपी तेथे आले. यापैकी तिघांनी तोंडाला रुमाल, उपरणे किंवा शाल बांधलेली होती, तर त्यांचा चौथा साथीदार टेहळणी करत होता. तोंड झाकलेल्या या तिघांनी अचानक तलवारीसारख्या धारदार हत्याराने समीरवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हल्ला करणाऱ्यांपैकी एका आरोपीने समीरचा गळा चिरला, तर दुसऱ्याने त्याला चाकूने भोसकले. अवघ्या ३० सेकंदांत हा जीवघेणा हल्ला करून सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीरला पाहून नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.



मित्राच्या फोननंतर समीर खानची हत्या


समीर खान यांना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा मित्र शारेक बाली याचा फोन आला. त्याला भेटण्यासाठी समीर खान घरातून आपल्या दुचाकीवरून (MH-20-GD-4058) निघाले होते. घटनेनंतर शारेक बाली यानेच समीर यांच्या पत्नीला, सना यांना फोन केला आणि सांगितले की, "भाभी, समीरला तीन-चार जणांनी हत्याराने मारले." माहिती मिळताच समीर यांची पत्नी सना यांनी शहाबाजार सिटीझन हॉस्पिटलसमोरील गल्लीत धाव घेतली, तेव्हा त्यांना त्यांचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शारेक बाली यानेच समीर यांच्या पत्नीला सांगितले की, शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस या चार जणांनी तलवारीने हल्ला केला. या माहितीमुळे पोलिसांनी आरोपींच्या शोधाची आणि पुढील तपासाची दिशा निश्चित केली आहे.



पाचही आरोपी ताब्यात; जुन्या वादातून सूडबुद्धीने हत्या झाल्याचे उघड


समीर खान यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही हत्या सूडबुद्धीने झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे आरोपींची ओळख पटवली. खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास करून सर्व पाचही आरोपींना ताब्यात घेतले. समीर खान यांची पत्नी सना खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हत्येमागे जुन्या वादाचे कारण आहे, समीर खान शहागंज मंडी परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. २८ ऑक्टोबर रोजी शोएब अन्वर खान याने समीर खान आणि त्यांचे साथीदार शाहरुख यांच्यावर शस्त्राने हल्ला केला होता, ज्याचा गुन्हा सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी समीर यांनी आसिफ रायडर, हफिज उर्फ टकला आणि शोएब काला या तिघांविरुद्ध शिवीगाळ, मारहाण आणि धमकीची दुसरी तक्रार दिली होती. याच जुन्या तक्रारीचा राग मनात धरून आणि सूडबुद्धीने, आसिफ रायडर, शोएब काला, ईसरार खान, नसिर उर्फ ईंता आणि असलम चाऊस या पाच जणांनी एकत्र येत पती समीर खान यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचा खून केल्याचे सना यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना आज सकाळी (शनिवारी) कोर्टात हजर केले जाणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,

Madgaon Tejas Express : तेजस एक्स्प्रेसमध्ये नाश्त्याऐवजी बिस्किट पुडा! IRCTCकडून कंत्राटदाराला दणका!

मडगाव : मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये (Madgaon Tejas Express) प्रवाशांना दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत