सिकंदर शेखमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीला लागला बट्टा : पंजाब पोलिसांनी केली अटक

पुणे : महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा जिंकणं प्रत्येक कुस्तीपट्टूचं स्वप्न असतं. २०२३ - २०२४ वर्षी सोलापूरच्या सिकंदर शेख या पट्ट्याने मानाची महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकत सोलापूरचे नाव मोठे केले. परंतु पंजाब पोलिसांनी शस्त्र बाळगण्याप्रकरणी सिंकदर शेखसह चार जणांना अटक केली आहे. या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय शस्त्र पुरवठा साखळीचा पर्दाफाश झाला आहे.


वडिलांनी हमाली करून वाढवलेला पैलवान सिकंदर शेखच्या शस्त्र तस्करीच्या कारनाम्याने आजपर्यंत कमावलेली प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. सांगलीच्या मल्लानी देखील शेखच्या अटकेवर संताप व्यक्त केला आहे.


शेखचा हा गुन्हा अत्यंत गंभीर असून, शस्त्र तस्करी प्रकरणात त्याचा उघड झालेला संबंध आणि त्याच्या संपर्कात महाराष्ट्रात कोण कोण होते याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे असे मत सांगलीचे ज्येष्ठ मल्ल वस्ताद संजय भोकरे यांनी सिकंदर शेखच्या अटकेबाबत मांडले आहे.


ज्या महाराष्ट्राने सिकंदर शेखला डोक्यावर घेतलं तो महाराष्ट्र या चुकीला पाठीशी घालणार नाही. आणि सिकंदरच्या कुटुंबीयांनीही केल्या जाणाऱ्या आरोपांचे खंडन करणे देखील चुकीचे आहे. एखादा खेळाडू बाबत कुणीच खोटे आरोप करणार नाही., दुसरीकडे सिकंदर शेखच्या विरोधात आणखी पुरावे सापडत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे अशी मागणी भोकरे यांनी केली आहे.


प्रतिष्ठा धुळीला मिळवली


सिकंदर हा मूळचा सोलापूरचा असला तरी त्याने कोल्हापुरातून कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. कोल्हापुरातील तालमीमध्ये त्यानं कुस्तीचे धडे गिरवले. २०२३ यामध्ये महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला आणि महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचला.


महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर त्याने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर हा गेल्या काही आठवड्यापासून पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहून शस्त्र पुरवठा प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम करत होता .

Comments
Add Comment

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी

दिल्ली स्फोटासाठी घरघंटीत बनवली स्फोटके

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात पोलिसांना मोठा

शौर्य पाटील मृत्यू प्रकरणी दिल्ली सरकारची चौकशी समिती

सेंट कोलंबस शाळेच्या चार शिक्षिका निलंबित नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा १६

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय