कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप महाराज यांचं शुक्रवारी पहाटे पंढरपूर येथे निधन झालं. कार्तिकी एकादशी निमित्त ते पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.


गुरुवारी रात्री ते कीर्तन करून आपल्या निवासस्थानी परतले असता त्यांना पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.


वैभववाडी तालुक्यातील आखवणे पुनर्वसन गावठण येथील रहिवासी असलेल्या नागप महाराजांनी वडिलांकडून कीर्तन परंपरेचा वारसा घेतला आणि तो अखेरपर्यंत जपला.


कीर्तनकार सोबत समाजसेवकही होते. मुंबईतील बेस्ट खात्यात अधिकारी म्हणून सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतर ते पूर्णपणे समाजकार्यात गुंतले. अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून कार्यरत राहून त्यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेकांना सानुग्रह अनुदान मिळालं. तसेच आखवणे भोम आणि नागपवाडी पुनर्वसन गावठण उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता.


शांत, संयमी, अभ्यासू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या या कीर्तनकाराच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायात आणि वैभववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : नसरापूर प्रकरणी न्यायालयात तीन लहान मुलांची साक्ष

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्यात एक मोठी घडामोडी

Sex Determination Tests : धक्कादायक! व्हिडिओमुळे काळा धंदा उघड; आरोपी थेट घरी जाऊन करत होता गर्भलिंग निदान चाचणी

पुण्यातील दौंड (Daund Crime) तालुक्यात अवैध गर्भलिंग निदान चाचण्या केल्याच्या संशयावरून यवत पोलिसांनी एका

Solapur Sucide News : पत्नीसाठी शेवटचा संदेश रेकॉर्ड केला, नंतर घेतला टोकाचा निर्णय; सोलापूरमध्ये धक्कादायक घटना!

सोलापूर : सोलापूर (Solapur) शहरात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या (Sucide) केल्याच्या धक्कादायक घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

New MIDC : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नवी एमआयडीसी; मावळ तालुक्यात १,१०० एकरांवर औद्योगिक प्रकल्प

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी

 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन