कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप महाराज यांचं शुक्रवारी पहाटे पंढरपूर येथे निधन झालं. कार्तिकी एकादशी निमित्त ते पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.


गुरुवारी रात्री ते कीर्तन करून आपल्या निवासस्थानी परतले असता त्यांना पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.


वैभववाडी तालुक्यातील आखवणे पुनर्वसन गावठण येथील रहिवासी असलेल्या नागप महाराजांनी वडिलांकडून कीर्तन परंपरेचा वारसा घेतला आणि तो अखेरपर्यंत जपला.


कीर्तनकार सोबत समाजसेवकही होते. मुंबईतील बेस्ट खात्यात अधिकारी म्हणून सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतर ते पूर्णपणे समाजकार्यात गुंतले. अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सरचिटणीस म्हणून कार्यरत राहून त्यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेकांना सानुग्रह अनुदान मिळालं. तसेच आखवणे भोम आणि नागपवाडी पुनर्वसन गावठण उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता.


शांत, संयमी, अभ्यासू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या या कीर्तनकाराच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायात आणि वैभववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; त्यांनी रामरक्षेची किमान दोन पाने तरी स्वतः वाचावीत मुंबई : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)