दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल; नेमके काय झाले ?

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. धर्मेंद्र यांचे वय ९० वर्ष आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत बातम्या समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.


प्राथमिक माहितीनुसार, धर्मेंद्र यांना कोणताही गंभीर त्रास नाही, तर हे केवळ नियमित आरोग्य तपासणी (रूटीन चेकअप) आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही दिवसांसाठी रुग्णालयात राहण्याचा निर्णय घेतला आहे.


सूत्रांनी सांगितले आहे की “चिंता करण्यासारखं काहीच कारण नाही. धर्मेंद्रजी पूर्णपणे ठणठणीत आहेत. हे फक्त नियमित आरोग्य तपासणीसाठीच आहे आणि ते लवकरच घरी परततील.”


सूत्रांच्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वीही धर्मेंद्र यांनी रूटीन चेकअप करून घेतला होता. त्यामुळे आता देखील खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दाखल केले असल्याचं सांगितलं जात आहे.


धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलंही पहिली वेळ नाही. २०२३ मध्ये त्यांची प्रकृती बिघडल्याने मुलगा सनी देओल यांनी त्यांना उपचारासाठी अमेरिकेत नेले होते. त्यावेळी पत्नी हेमा मालिनी यांनीही स्पष्ट केलं होतं की धर्मेंद्र हे नियमित तपासणीसाठीच गेले आहेत.


धर्मेंद्र आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ते लवकरच अगस्त्य नंदा सोबतच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात झळकणार आहेत. अलीकडेच त्यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रमोशनमध्ये सहभाग घेतला होता.


आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फूल पत्थर, चुपके चुपके, शोले, धरम वीर यांसारख्या अजरामर चित्रपटांनी त्यांना बॉलिवूडचा “ही-मॅन” बनवलं.


वयाच्या उत्तरार्धात असूनही धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) वरून आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असतात. जुन्या आठवणी, शूटिंगचे किस्से आणि वैयक्तिक विचार ते नियमितपणे शेअर करतात.


धर्मेंद्र यांच्या रुग्णालयात दाखल होण्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी “लवकर बरे व्हा धरम पाजी” अशा शब्दांत काळजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वडूज येथे भव्य तिरंगा रॅली

वडूज, ता. खटाव : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून,

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की