Police Nameplates : 'खाकी'त 'आडनावा'ची ओळख संपणार? बीडच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतर जिल्ह्यांमध्येही स्वागत; लवकरच पोलीस नेमप्लेटवरून आडनाव 'गायब'!

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या वर्दीवरील (Police Uniform) खाकी गणवेश (Khaki Uniform) आणि त्यावर असलेली नावपट्टी ही सर्वसामान्य ओळख आहे. मात्र, आता या परंपरेत बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांच्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याच्या निर्णयाने राज्यभरात चर्चेला सुरुवात झाली होती. आता या निर्णयाचे अनुकरण छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलातही (Chhatrapati Sambhajinagar City Police Force) होत आहे. काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवले आहे. या निर्णयाकडे नागरिक आणि प्रशासनाचे विशेष लक्ष वेधले गेले असून, या बदलामागील उद्देशांवर चर्चा सुरू आहे.



जातीयवादाच्या वादातून बीडमध्ये पोलिसांच्या वर्दीवरील आडनाव हटवण्याचा निर्णय


बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या जातीवर आधारित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पोलीस विभागातही जातीय नियुक्त्यांबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील तसेच कार्यालयीन नावपट्टांवरील आडनावे हटवण्याचे निर्देश दिले. हा निर्णय जातीय ओळख मिटवून पोलीस दलात समानता आणि निष्पक्षता वाढवण्याच्या उदात्त उद्देशाने घेण्यात आला. राज्यभरात या पावलाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. मात्र, दुसरीकडे केवळ आडनाव हटवल्याने जातीयवाद संपेल का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.



पोलीस दलात 'एकजूट' वाढवण्यासाठी नावपट्टीवर केवळ नावाचा उल्लेख


बीडनंतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातही पोलीस गणवेशावरील आडनाव हटवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या निर्णयामागे कर्मचाऱ्यांमधून अनेक सकारात्मक मते व्यक्त होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते, नावपट्टीवरील आडनावावरून एखाद्या व्यक्तीची जात वा धर्म सहज ओळखता येतो. यामुळे 'आपला -परका' असा भेदभाव निर्माण होण्याची शक्यता वाढते. काही कर्मचाऱ्यांचे मत आहे की, नियुक्ती आणि बदली प्रक्रियेतही अशा जातीय ओळखीचा सूक्ष्म प्रभाव पडू शकतो. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी (Prashant Swami) यांनी या बदलाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "आडनावविरहित नावपट्टीचा प्रसार झाला, तर तो दलातील एकजूट आणि निष्पक्षता वाढविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल ठरेल." त्यांनी स्वत: आपल्या पसंतीने नावपट्टीवरील आडनाव हटवले असून, 'आपण आपल्यापुरते पालन करतो आहोत,' असेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य