Police Nameplates : 'खाकी'त 'आडनावा'ची ओळख संपणार? बीडच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतर जिल्ह्यांमध्येही स्वागत; लवकरच पोलीस नेमप्लेटवरून आडनाव 'गायब'!

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या वर्दीवरील (Police Uniform) खाकी गणवेश (Khaki Uniform) आणि त्यावर असलेली नावपट्टी ही सर्वसामान्य ओळख आहे. मात्र, आता या परंपरेत बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांच्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याच्या निर्णयाने राज्यभरात चर्चेला सुरुवात झाली होती. आता या निर्णयाचे अनुकरण छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलातही (Chhatrapati Sambhajinagar City Police Force) होत आहे. काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवले आहे. या निर्णयाकडे नागरिक आणि प्रशासनाचे विशेष लक्ष वेधले गेले असून, या बदलामागील उद्देशांवर चर्चा सुरू आहे.



जातीयवादाच्या वादातून बीडमध्ये पोलिसांच्या वर्दीवरील आडनाव हटवण्याचा निर्णय


बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या जातीवर आधारित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पोलीस विभागातही जातीय नियुक्त्यांबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील तसेच कार्यालयीन नावपट्टांवरील आडनावे हटवण्याचे निर्देश दिले. हा निर्णय जातीय ओळख मिटवून पोलीस दलात समानता आणि निष्पक्षता वाढवण्याच्या उदात्त उद्देशाने घेण्यात आला. राज्यभरात या पावलाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. मात्र, दुसरीकडे केवळ आडनाव हटवल्याने जातीयवाद संपेल का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.



पोलीस दलात 'एकजूट' वाढवण्यासाठी नावपट्टीवर केवळ नावाचा उल्लेख


बीडनंतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातही पोलीस गणवेशावरील आडनाव हटवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या निर्णयामागे कर्मचाऱ्यांमधून अनेक सकारात्मक मते व्यक्त होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते, नावपट्टीवरील आडनावावरून एखाद्या व्यक्तीची जात वा धर्म सहज ओळखता येतो. यामुळे 'आपला -परका' असा भेदभाव निर्माण होण्याची शक्यता वाढते. काही कर्मचाऱ्यांचे मत आहे की, नियुक्ती आणि बदली प्रक्रियेतही अशा जातीय ओळखीचा सूक्ष्म प्रभाव पडू शकतो. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी (Prashant Swami) यांनी या बदलाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "आडनावविरहित नावपट्टीचा प्रसार झाला, तर तो दलातील एकजूट आणि निष्पक्षता वाढविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल ठरेल." त्यांनी स्वत: आपल्या पसंतीने नावपट्टीवरील आडनाव हटवले असून, 'आपण आपल्यापुरते पालन करतो आहोत,' असेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)