Police Nameplates : 'खाकी'त 'आडनावा'ची ओळख संपणार? बीडच्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतर जिल्ह्यांमध्येही स्वागत; लवकरच पोलीस नेमप्लेटवरून आडनाव 'गायब'!

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या वर्दीवरील (Police Uniform) खाकी गणवेश (Khaki Uniform) आणि त्यावर असलेली नावपट्टी ही सर्वसामान्य ओळख आहे. मात्र, आता या परंपरेत बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. बीड जिल्ह्यात पोलिसांच्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याच्या निर्णयाने राज्यभरात चर्चेला सुरुवात झाली होती. आता या निर्णयाचे अनुकरण छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलातही (Chhatrapati Sambhajinagar City Police Force) होत आहे. काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावपट्टीवरून आडनाव हटवले आहे. या निर्णयाकडे नागरिक आणि प्रशासनाचे विशेष लक्ष वेधले गेले असून, या बदलामागील उद्देशांवर चर्चा सुरू आहे.



जातीयवादाच्या वादातून बीडमध्ये पोलिसांच्या वर्दीवरील आडनाव हटवण्याचा निर्णय


बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांच्या जातीवर आधारित यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पोलीस विभागातही जातीय नियुक्त्यांबाबत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील तसेच कार्यालयीन नावपट्टांवरील आडनावे हटवण्याचे निर्देश दिले. हा निर्णय जातीय ओळख मिटवून पोलीस दलात समानता आणि निष्पक्षता वाढवण्याच्या उदात्त उद्देशाने घेण्यात आला. राज्यभरात या पावलाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. मात्र, दुसरीकडे केवळ आडनाव हटवल्याने जातीयवाद संपेल का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.



पोलीस दलात 'एकजूट' वाढवण्यासाठी नावपट्टीवर केवळ नावाचा उल्लेख


बीडनंतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातही पोलीस गणवेशावरील आडनाव हटवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या निर्णयामागे कर्मचाऱ्यांमधून अनेक सकारात्मक मते व्यक्त होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते, नावपट्टीवरील आडनावावरून एखाद्या व्यक्तीची जात वा धर्म सहज ओळखता येतो. यामुळे 'आपला -परका' असा भेदभाव निर्माण होण्याची शक्यता वाढते. काही कर्मचाऱ्यांचे मत आहे की, नियुक्ती आणि बदली प्रक्रियेतही अशा जातीय ओळखीचा सूक्ष्म प्रभाव पडू शकतो. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी (Prashant Swami) यांनी या बदलाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "आडनावविरहित नावपट्टीचा प्रसार झाला, तर तो दलातील एकजूट आणि निष्पक्षता वाढविण्यासाठी स्वागतार्ह पाऊल ठरेल." त्यांनी स्वत: आपल्या पसंतीने नावपट्टीवरील आडनाव हटवले असून, 'आपण आपल्यापुरते पालन करतो आहोत,' असेही स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले