Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शूटिंगच्या नावाखाली मुलांना बोलावून त्यांना बंधक (Hostage) बनवून ठेवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. हा सर्व प्रकार पवईतील आरए स्टुडिओमध्ये (RA Studio) घडला. रोहित आर्या (Rohit Arya) नावाचा व्यक्ती या कृत्यासाठी जबाबदार होता. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने बचाव अभियान (Rescue Operation) सुरू केले आणि ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केली. मात्र, हे बचाव ऑपरेशन सुरू असताना पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झाला. या घटनेने मुंबईतील पालक वर्गाला हादरवून सोडले असून, त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरणनिर्माण झाले आहे.



पवई घटनेनंतर आरए स्टुडिओची प्रतिक्रिया; पोलिसांच्या तत्काळ कारवाईचे कौतुक


मुंबईच्या पवई (Powai) येथील आरए स्टुडिओमध्ये (RA Studio) मुलांच्या ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, आता संबंधित स्टुडिओची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. आरए स्टुडिओने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "काल (गुरुवारी) आमच्या स्टुडिओमध्ये एक अनपेक्षित (Unexpected) आणि धक्कादायक घटना घडली." हा सर्व प्रकार 'अन्य व्यक्तीने केलेल्या बुकिंगदरम्यान' घडलेला असल्याचे स्टुडिओने स्पष्ट केले. स्टुडिओने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले, "मुंबई पोलिसांनी तत्काळ केलेल्या कारवाईमुळे मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले." स्टुडिओ टीम पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत असून, योग्य ती मदत करत असल्याची ग्वाही स्टुडिओने दिली आहे. भविष्यातही कलाकारांना योग्य ते सहकार्य करण्याच्या भूमिकेत स्टुडिओ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



पोलिसांना यश न आल्याने बचाव अभियानात गोळीबार.


पवईतील आरए स्टुडिओमध्ये मुलांना बंधक बनवणाऱ्या आरोपी रोहित आर्याने हे कृत्य करण्यापूर्वी मोठा कट रचल्याचे समोर आले आहे. मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी रोहित आर्यानं सर्व मुलांच्या पालकांना एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्याने म्हटलं होतं की, "आज शूटिंगला वेळ लागणार आहे, त्यामुळे मुलांना दहा मिनिटांत भेटून घ्या." त्यानंतर लगेचच आर्याने हॉलचे दरवाजे बंद करून मुलांना ओलीस ठेवलं आणि काही वेळातच स्वतःचा व्हिडिओ (Self-video) प्रसिद्ध केला. या घटनेनंतर पोलीस तब्बल दीड ते पावणेदोन तास रोहित आर्याशी बोलत होते. पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचा (Trying to Convince) प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना यश आलं नाही, त्यामुळे अखेरीस बचाव अभियान (Rescue Operation) सुरू करावे लागले, ज्यात गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला.



पोलिसांनी 'असे' पूर्ण केले थरारक बचाव ऑपरेशन


रोहित आर्या हा पोलिसांचे ऐकत नाही, हे लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी अत्यंत रणनीतीपूर्वक आणि धाडसी बचाव अभियान राबवले. आरोपी ऐकत नाही हे लक्षात येताच, पोलिसांनी आर्याला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच वेळी, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी शिडीचा वापर करून टॉयलेटच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये गुप्तपणे प्रवेश केला. पवई पोलीस ठाण्याचे एटीसी सेलचे एपीआय अमोल वाघमारे (API Amol Waghmare) हे साध्या वेषात खिडकीतून आत गेले. वाघमारे यांना बघताच रोहित आर्या हा बॅगमधून शस्त्र काढण्याच्या तयारीत होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्याच क्षणी एपीआय वाघमारे यांनी रोहित आर्यावर गोळी झाडली (Fired a Shot), ज्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन