कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील २७ गावांतील रस्ते पथदिव्यांनी प्रकाशमय

कल्याण  : २०२४ मध्ये शासनाने १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार २७ कोटी निधी मंजूर केला. त्यामुळे या दिवाळीत २७ गावातील एकूण २०७ रस्त्यांपैकी १४० रस्त्यांवरील एकूण २८०० पथदिवे कार्यान्वित केल्यामुळे या दीपावलीत २७ गावातील रस्ते पथदिव्यांनी उजळल्यामुळे खऱ्या अर्थाने दीपावली साजरी झाली. उर्वरित ६७ रस्त्यांवरील पथदिवे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस असल्याची माहिती विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.


सन २०१५ मध्ये २७ गावे ही महापालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर या २७ गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिवे व्यवस्था नव्हती. तसेच काही रस्त्यांवर असलेली पथदिवे व्यवस्था ही सुद्धा तांत्रिक दृष्ट्या सक्षम नव्हती. महापालिकेने महापालिकेच्या अंदाजपत्रकामधून काही रस्त्यांवर पथदिवे व्यवस्था केली; परंतु ती पुरेशी नव्हती. सन २०२३ मध्ये २७ गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पथदिवे व्यवस्था करणेकामी २७ कोटी निधीची मागणी महापालिकेने महाराष्ट्र शासनाकडे केली होती. २७ गावांमधील २०७ रस्त्यांवर ४६७९ पथदिवे पोल व ५२३५ पथदिवे व्यवस्था करणेकामी ऑगस्ट २०२४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर २०२४ मध्ये कामास सुरुवात केली.


महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २७ गावातील पायाभूत सुविधेबाबत विशेष लक्ष देऊन तातडीने सर्व कामे हाती घेण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना दिले होते. २७ गावातील पथदिवे कामाचा आढावा आयुक्त स्तरावर वेळोवेळी झाल्याने २७ गावातील पथदिवे कामांना
गती मिळाली.

Comments
Add Comment

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे

Mira Road Forced Conversion : लग्नाचे आमिष, धर्मांतराची सक्ती अन् अमानुष मारहाण! मिरा रोडमध्ये हिंदू तरुणीसोबत घडला संतापजनक प्रकार

मुंबई (Mira Road Forced Conversion Case) : मुंबईलगतच्या मिरा रोड (Mira Road) परिसरातील काशीमीरा येथे एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून

Kalyan Crime : प्रेमविवाहाचा राग मनातच ठेवला; साखरपुडा मोडून लग्न केलेल्या मुलीची वडिलांनी केली हत्या

Crime News : कल्याण शहरात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका

Pune Fugewadi Suspicious Death : तुकाराम मुंढेंचा धडाका! पुण्यात २२ बळी घेणाऱ्या विषारी दारूकांडाचे 'भिवंडी कनेक्शन' उघड;

'रेक्स इंटरनॅशनल'वर छापा टाकत हजारो किलो मिथेनॉल जप्त पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) परिसरात गावठी