मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली; विरोधकांची झाली पंचाईत !

मुंबई : मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी उद्या निवडणूक आयोगाविरोधात “सत्याचा मोर्चा” काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात अनेक विरोधी नेते सहभागी होणार आहेत


या मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, तसेच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोर्चाची सुरुवात दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून होणार होती. मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा मोर्चा जाणार होता.


मात्र, या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा काढण्यास नियमांनुसार परवानगी देता येत नाही. आझाद मैदानाच्या आत आंदोलन करता येईल, परंतु बाहेरून मोर्चा निघाल्यास तो विनापरवाना ठरेल. आणि विनापरवाना मोर्चा काढल्यास आंदोलनकर्त्यांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे.


राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेला इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “विनापरवाना मोर्चा काढल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.” त्यामुळे विरोधकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे 'टॅरिफ युद्ध' थंडावणार?

चीन अमेरिकेचे कृषी, ऊर्जा उत्पादन खरेदी करणार; फेंटॅनाईल संकटावर मदत करण्याचे आश्वासन ग्योंगजू (दक्षिण कोरिया):

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ: