मुंबई महापालिकेच्या घरांच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद

नोंदणी केली १७ हजारांहून अधिक, अनामत रक्कम भरली केवळ २२९ अर्जदारांनी


मुंबई  : सर्वसामान्य माणसांना मुंबईत घर घेणे शक्य व्हावे म्हणून महापालिकेच्यावतीने ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून आतापर्यंत १७ हजार ५३८ अर्जदारांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. मात्र, यापैकी ११ हजार अनामत केवळ २२९ अर्जदारांनी भरलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत नोंदणी शुल्क भरलेल्या केवळ ३० ते ३५ टक्के अर्जदारांनी अनामत रक्कम भरल्याने नोंदणी करणाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.


मुंबईचा विकास आराखडा तयार करून परवडणारी घरे बांधण्याचा संकल्प केल्यानंतर आता ही प्रत्यक्षात याचा लाभ मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४२६ घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांच्या नोंदीनुसार, आतापर्यंत १७५३८ अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, ही नोंदणी केल्यानंतर त्यासोबत नोंदणी शुल्क भरल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. त्यासाठी ११८० रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या अर्जदारांपैंकी केवळ ७७२ अर्जदारांनीच नोंदणी शुल्क भरले आहे. तर घरांच्या किंमतीनुसार अर्जासोबत अनामत ११ हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक असते. अशाप्रकारे केवळ २२९ अर्जदारांनीच अर्जासोबत अनामत भरलेली आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी,भायखळा तसेच भांडुप आदी भागांमध्ये या सदनिका असून या सदनिकांची रक्कम कमीत कमी ५४ लाख ते जास्तीत जास्त १ कोटी १० लाखांपर्यंत आहे.


Comments
Add Comment

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती