मुंबई महापालिकेच्या घरांच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद

नोंदणी केली १७ हजारांहून अधिक, अनामत रक्कम भरली केवळ २२९ अर्जदारांनी


मुंबई  : सर्वसामान्य माणसांना मुंबईत घर घेणे शक्य व्हावे म्हणून महापालिकेच्यावतीने ४२६ घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून आतापर्यंत १७ हजार ५३८ अर्जदारांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. मात्र, यापैकी ११ हजार अनामत केवळ २२९ अर्जदारांनी भरलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत नोंदणी शुल्क भरलेल्या केवळ ३० ते ३५ टक्के अर्जदारांनी अनामत रक्कम भरल्याने नोंदणी करणाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.


मुंबईचा विकास आराखडा तयार करून परवडणारी घरे बांधण्याचा संकल्प केल्यानंतर आता ही प्रत्यक्षात याचा लाभ मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४२६ घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु झाली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांच्या नोंदीनुसार, आतापर्यंत १७५३८ अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र, ही नोंदणी केल्यानंतर त्यासोबत नोंदणी शुल्क भरल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. त्यासाठी ११८० रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या अर्जदारांपैंकी केवळ ७७२ अर्जदारांनीच नोंदणी शुल्क भरले आहे. तर घरांच्या किंमतीनुसार अर्जासोबत अनामत ११ हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक असते. अशाप्रकारे केवळ २२९ अर्जदारांनीच अर्जासोबत अनामत भरलेली आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी,भायखळा तसेच भांडुप आदी भागांमध्ये या सदनिका असून या सदनिकांची रक्कम कमीत कमी ५४ लाख ते जास्तीत जास्त १ कोटी १० लाखांपर्यंत आहे.


Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा