भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा मोठी निराशा सहन करावी लागली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताची फलंदाजी पुन्हा डळमळीत झाली. सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि अखेर संपूर्ण संघ १८.४ षटकांत फक्त १२५ धावांवर गडगडला.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. जोश हेझलवूड आणि नॅथन एलिस यांनी भारताच्या महत्वाच्या विकेट घेतल्या. हेझलवूडने शुभमन गिल (५), सूर्यकुमार यादव (१) आणि तिलक वर्मा (०) या महत्वाच्या विकेट घेतल्या. तर नॅथन एलिसनं संजू सॅमसनला (२) माघारी पाठवलं. अक्षर पटेल (७) रनआऊट झाला आणि अवघ्या ४९ धावांवर भारताचा अर्धा संघ तंबूत परतला.


या बिकट परिस्थितीत अभिषेक शर्मानं एकहाती खिंड लढवली. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत ३७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा ठोकल्या. त्याच्या साथीला हर्षित राणाने (३५ धावा) उत्तम साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ४७ चेंडूंमध्ये ५६ धावांची उल्लेखनीय भागीदारी करत भारताला काहीसा आधार दिला.


अभिषेकने या खेळीत अनेक विक्रम मोडले, त्याने २५ इनिंग्जनंतर विराट कोहलीच्या (९०६) सर्वाधिक धावांच्या विक्रमाला मागे टाकले आणि पहिल्या २५ डावांत ८ वेळा ५०+ धावांची खेळी करून विराटच्या विक्रमाशी बरोबरी साधली.


मात्र, हर्षित बाद झाल्यानंतर पुन्हा भारताचा डाव फसला. शिवम दुबे (४) आणि कुलदीप यादव (०) काहीच करू शकले नाहीत. शेवटी अभिषेक शर्माची विकेट गेल्यानंतर जसप्रीत बुमरहा रनआऊट झाला आणि भारताचा डाव १२५ धावांवर आटोपला.


भारतीय फलंदाजीतील अस्थिरता आणि सततची विकेट गळती ही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अभिषेक शर्माच्या झळाळत्या अर्धशतकाने थोडी आशा निर्माण केली असली तरी बाकीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला या सामन्यात स्पर्धात्मक धावसंख्या उभारता आली नाही.

Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ