भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा मोठी निराशा सहन करावी लागली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताची फलंदाजी पुन्हा डळमळीत झाली. सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि अखेर संपूर्ण संघ १८.४ षटकांत फक्त १२५ धावांवर गडगडला.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. जोश हेझलवूड आणि नॅथन एलिस यांनी भारताच्या महत्वाच्या विकेट घेतल्या. हेझलवूडने शुभमन गिल (५), सूर्यकुमार यादव (१) आणि तिलक वर्मा (०) या महत्वाच्या विकेट घेतल्या. तर नॅथन एलिसनं संजू सॅमसनला (२) माघारी पाठवलं. अक्षर पटेल (७) रनआऊट झाला आणि अवघ्या ४९ धावांवर भारताचा अर्धा संघ तंबूत परतला.


या बिकट परिस्थितीत अभिषेक शर्मानं एकहाती खिंड लढवली. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत ३७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा ठोकल्या. त्याच्या साथीला हर्षित राणाने (३५ धावा) उत्तम साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ४७ चेंडूंमध्ये ५६ धावांची उल्लेखनीय भागीदारी करत भारताला काहीसा आधार दिला.


अभिषेकने या खेळीत अनेक विक्रम मोडले, त्याने २५ इनिंग्जनंतर विराट कोहलीच्या (९०६) सर्वाधिक धावांच्या विक्रमाला मागे टाकले आणि पहिल्या २५ डावांत ८ वेळा ५०+ धावांची खेळी करून विराटच्या विक्रमाशी बरोबरी साधली.


मात्र, हर्षित बाद झाल्यानंतर पुन्हा भारताचा डाव फसला. शिवम दुबे (४) आणि कुलदीप यादव (०) काहीच करू शकले नाहीत. शेवटी अभिषेक शर्माची विकेट गेल्यानंतर जसप्रीत बुमरहा रनआऊट झाला आणि भारताचा डाव १२५ धावांवर आटोपला.


भारतीय फलंदाजीतील अस्थिरता आणि सततची विकेट गळती ही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अभिषेक शर्माच्या झळाळत्या अर्धशतकाने थोडी आशा निर्माण केली असली तरी बाकीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला या सामन्यात स्पर्धात्मक धावसंख्या उभारता आली नाही.

Comments
Add Comment

टी-२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक जाहीर, १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना

दुबई : आयसीसीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, भारताचा पहिला सामना ७

रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

दुबई : भारताच्या माजी कर्णधार आणि दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेता रोहित शर्मा याची आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी

द. आफ्रिकेची स्थिती मजबूत, गुवाहाटी कसोटी अनिर्णित राहणार की भारत हरणार ?

गुवाहाटी : गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ जसजसा पुढे सरकतोय, तसतसा भारताचा पराभव जवळ

T20 World Cup 2026 Full Schedule : ४ गट, २० संघ! २०२६ च्या ICC T-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; संपूर्ण ग्रुप रचना आणि सामन्यांची ठिकाणे; तुमचा आवडता संघ कुठे खेळणार?

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसी विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) स्पर्धेचे

विजेत्या संघात महाराष्ट्राच्या गंगा कदमचा सिंहाचा वाटा

अंध महिला क्रिकेट विश्वचषकात भारताचा ऐतिहासिक विजय मुंबई : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबो, श्रीलंका

प्रांजली धुमाळला २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक

टोकियो  : भारताच्या प्रांजली प्रशांत धुमाळने टोकियो येथे झालेल्या २५ व्या उन्हाळी डेफलिंपिकमध्ये २५ मीटर