वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना अनुकूल असणारी झाडे लावण्यात यावीत, असे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.


मंत्री नाईक यांनी मंत्रालयात वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.


वसई विरार महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये पिकनिक पार्कचे आरक्षण आहे. या सात एकर जागेवर बर्ड पार्क उभारण्यात यावे. यासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कार्यवाही तातडीने करावी. पक्षांना अनुकूल असणारी झाडे शासकीय नर्सरीत नसतील तर खासगी नर्सरीतून अशी झाडे घेण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.


यावेळी वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज सुर्यवंशी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आदी उपस्थित होते.



आयुष्मान आरोग्य मंदिरांचे अनावरण


वसई विरार महापालिकेच्या वतीने ११ आयुष्मान आरोग्य मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. या आरोग्य मंदिरांचे ऑनलाईन अनावर पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.


पालघर महापालिका हद्दीतील ११७ शाळा व तीन आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Comments
Add Comment

बॉग बॉस मराठी घरातील पहिली स्पर्धक आली समोर ; ग्लॅमरस अंदाजात झळकली अभिनेत्री

Big Boss Marathi 6 : सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'बिग बॉस मराठीचे स्पर्धक कोणकोण असणार आहेत. मराठी

T-Series चे मालक गुलशन कुमारच्या हत्येतील मुख्य आरोपीचा मृत्यु; नक्की काय झाल ?

टी-सीरिज म्युझिक कंपनीचे संस्थापक आणि देशातील उद्योगपती गुलशनकुमार यांच्या अंधेरी येथील वैश्नवी देवीच्या

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड

वाढदिवस विशेष : कॉलेजमधील स्वप्नांपासून जागतिक सहकार्यासाठी — युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत फरहान अख्तरच्या सर्जनशील प्रवासाचा शिखरबिंदू

फरहान अख्तरच्या वाढदिवसानिमित्त, एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण स्वप्नवत विद्यार्थ्यापासून जागतिक पातळीवर

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी

खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून