Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. 'मोंथा' (Montha) चक्रीवादळाच्या (Cyclone) पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. वादळामुळे कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (Maharashtra Maritime Board) मुंबईतील मांडवा – गेटवे ऑफ इंडिया (Mandwa – Gateway of India) जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे हवामान अस्थिर झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू होता, अगदी दिवाळीचा सणही पावसातच गेला. पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी, आता मोंथा वादळामुळे परिस्थिती पुन्हा बदलली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) कोकण किनारपट्टीवर पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



'मोंथा' वादळ आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मोठा निर्णय


'मोंथा' वादळामुळे मुंबईतील समुद्र खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर (Weather Department Warning) प्रशासनाने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने 'मांडवा - गेटवे ऑफ इंडिया' जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या बंदीमध्ये केवळ 'मालदार कॅप्टन' (Maldar Captain) ही बोट तात्पुरती सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर सर्व बोटी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने 'नंबर ३ चा इशारा' दिल्यानंतर अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा आणि उरण परिसरातील सर्व मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात न नेता किनाऱ्यावरच सुरक्षित उभ्या केल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी ही मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.



कोकणातील काजू बागा संकटात; पाऊस वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता


दरम्यान, कोकण विभागात पावसाचा जोर वाढला आहे. या अवकाळी आणि सततच्या पावसाचा थेट फटका काजू बागांना बसत आहे, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या पावसामुळे काजूच्या झाडांवर बुरशीजन्य रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही भागांत काजूचा मोहोर गळून पडला (Cashew Bloom Dropped) आहे आणि झाडे सुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणि मच्छिमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



चिपळूणमध्ये जोरदार पाऊस: भातशेतीचे मोठे नुकसान


चिपळूण (Chiplun) तालुक्यात रात्रीपासून अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी त्रेधातिरपीट उडाली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भात शेतीला बसला आहे. शेतात पाणी साठल्यामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कापून ठेवलेले भात पीक रस्त्यावर वाळवण्यासाठी (Drying) ठेवले होते. मात्र, रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे आणि संततधारेमुळे हे पीक पूर्णपणे ओले झाले असून, कुजायला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे इतके मोठे नुकसान झाले आहे की, आता हे भात पीक वाचवणे (Saving the Crop) हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान बनले आहे. चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला असून, ते हवालदिल झाले आहेत. या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

बारामती बसस्थानकाला प्रथम क्रमांकाचे १ कोटी रुपयांचे बक्षीस — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान लाखणी आणि अकोलेही राज्यात अव्वल मुंबई: स्वर्गीय

जळगाव : यश जैनचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी अन...

जळगाव : अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीकडून लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याची खंडणी

Pune Crime : जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; १० जणांविरोधात गुन्हा दाखल,पुण्यात खळबळ

पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनगणनेचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला ५ ते १० जणांनी

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातपाठोपाठ राज्यातील 'या' 50 भोंदूंवर कारवाई , कारवाईत नाशिकचे सर्वाधिक भोंदू

नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण आले आणि या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवाले. खरात प्रकरण समोर येताच

Legislative Council : महायुतीत विधानपरिषदेच्या १५ जागांचे वाटप ठरले ? छत्रपती संभाजीनगरचा तिढा कायम

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांसाठी महायुतीमधील जागावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट

Crime : तुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना ? 'याठिकाणी' २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जळगाव : अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) भवरखेड येथील बनावट दूध निर्मितीवर कारवाई करत २६६ लिटर भेसळयुक्त दूध