Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. 'मोंथा' (Montha) चक्रीवादळाच्या (Cyclone) पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. वादळामुळे कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (Maharashtra Maritime Board) मुंबईतील मांडवा – गेटवे ऑफ इंडिया (Mandwa – Gateway of India) जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे हवामान अस्थिर झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू होता, अगदी दिवाळीचा सणही पावसातच गेला. पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी, आता मोंथा वादळामुळे परिस्थिती पुन्हा बदलली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) कोकण किनारपट्टीवर पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



'मोंथा' वादळ आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मोठा निर्णय


'मोंथा' वादळामुळे मुंबईतील समुद्र खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर (Weather Department Warning) प्रशासनाने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने 'मांडवा - गेटवे ऑफ इंडिया' जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या बंदीमध्ये केवळ 'मालदार कॅप्टन' (Maldar Captain) ही बोट तात्पुरती सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर सर्व बोटी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने 'नंबर ३ चा इशारा' दिल्यानंतर अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा आणि उरण परिसरातील सर्व मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात न नेता किनाऱ्यावरच सुरक्षित उभ्या केल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी ही मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.



कोकणातील काजू बागा संकटात; पाऊस वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता


दरम्यान, कोकण विभागात पावसाचा जोर वाढला आहे. या अवकाळी आणि सततच्या पावसाचा थेट फटका काजू बागांना बसत आहे, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या पावसामुळे काजूच्या झाडांवर बुरशीजन्य रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही भागांत काजूचा मोहोर गळून पडला (Cashew Bloom Dropped) आहे आणि झाडे सुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणि मच्छिमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



चिपळूणमध्ये जोरदार पाऊस: भातशेतीचे मोठे नुकसान


चिपळूण (Chiplun) तालुक्यात रात्रीपासून अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी त्रेधातिरपीट उडाली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भात शेतीला बसला आहे. शेतात पाणी साठल्यामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कापून ठेवलेले भात पीक रस्त्यावर वाळवण्यासाठी (Drying) ठेवले होते. मात्र, रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे आणि संततधारेमुळे हे पीक पूर्णपणे ओले झाले असून, कुजायला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे इतके मोठे नुकसान झाले आहे की, आता हे भात पीक वाचवणे (Saving the Crop) हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान बनले आहे. चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला असून, ते हवालदिल झाले आहेत. या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Road Accident : गुरुपौर्णिमेच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला! शिर्डीहून येणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; २ ठार, २३ जण जखमी

धाराशिव : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला.

Parth Pawar-Kainat Dhar : मान्यवरांच्या उपस्थितीत पार्थ पवार-कायनात दारा यांचा दिमाखदार साखरपुडा संपन्न

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा (Parth Pawar-Kainat Dhar) यांचा साखरपुडा गुरुवारी

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत; २३ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्य रेल्वेचे मोठे यश

मुंबई : अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेला मुंबई-पुणे रेल्वे संपर्क अखेर पूर्णपणे पूर्ववत करण्यात मध्य रेल्वेला यश

Chandrashekhar Bawankule : राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये; कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांचे निर्देश

१७ लाख कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध; दुसरी यादी १५ दिवसांत, जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

PUNE : पुण्यातील 'या' गणपती मंदिराचं अनोखे रहस्य! वर्षातून फक्त एकदाच उघडतं तळघर; 270 वर्षांची अनोखी परंपरा

पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती

Kolhapur Bull Incident Video : कोल्हापुरात बैलजोडी शर्यतीत थरार! बिथरलेला बैल जमावात घुसला अन् थेट...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील भादगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलजोडी सौंदर्य आणि ताकद